शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

आपल्याला राग का येतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 6:32 AM

सतत सतत राग येणं हे चांगलं आहे का?

ठळक मुद्देउठसुट राग

आपल्याला राग का येतो? ऋतूजा  मडावी, नागपूर

आपल्याला काहीही करण्याची इच्छा  नसते आणि आई कामं सांगते. आपण एखादा मस्त गेम खेळत असतो आणि आई फोन मागते,  खूप राग येतो. चिडचिड होते. का असं होतं?राग ही माणसाची मूलभूत भावना आहे. त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, मनासारखी झाली नाही की त्रस होतो आणि तोच त्रस मग रागातून व्यक्त होतो. राग सीमित स्वरूपात असेल आणि लगेच जाणारा असेल तर ठीके पण अतिसंताप, दीर्घकाळ राग धरून ठेवणं, राग आला म्हणून समोरच्याला हानी करण्याचा विचार मनात येणं या गोष्टी मात्र चुकीच्या आहेत. राग आला तरी तो लगेच गेला पाहिजे. राग कमी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे 1 ते 100 आकडे मोजायचे. अगदी सावकाश मोजायचे. आकडे मोजण्याच्या नादात आपण ब?्याचदा राग विसरून जातो. तसंच लहानांपासून मोठ्यांपयर्ंत सगळ्यांनी श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. अगदी सोपे सोपे. जसं की दीर्घ श्वसन. लांब श्वास आत घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. ही क्रिया करत असताना लक्ष संपूर्ण श्वासावर केंद्रित करायचं. असं केल्यानेही रागावर नियंत्रण ठेवता येतं आणि उठल्या सुटल्या राग येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. 

राग येणं नैसर्गिक आहे पण त्याचा अतिरेक मात्र नको. त्यामुळे सारखा राग येत असेल, चिडचिड होत असेल तर ती कशामुळे होतेय हेही बघायला हवं. अनेकदा भलत्याच गोष्टीचा राग भलत्याच गोष्टीवर निघतो. उदा. अनेक मुलांना भूक सहन होत नाही. भूक लागली, पोटात खड्डा पडला आणि लगेच काही खायला मिळालं नाही तर त्यांची चिडचिड सुरु होते आणि त्यातून त्यांना राग यायला लागतो. पण त्याचवेळी जर त्यांनी व्यवस्थित खाल्लं तर त्यांची चिडचिडही कमी होते आणि रागही निघून जातो. त्यामुळे रागवावं पण आपण का रागावलो आहोत आणि ते योग्य आहे का याचाही विचार केला पाहिजे.