‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. ...
लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा रोजगार हिरावला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने दिव्यांगांना रोजगार हमीवरील सुलभ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार २८३ कामगारांची ९२ लाख ५४ हजार रुपये रक्कम नगर न्यायालयात जमा केल्याची माहिती शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे यांनी दिली. ...