देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
इगतपुरी विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे उमेदवाराच्या शोधात असलेल्या कॉँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीने उमेदवाराची रसद पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कॉँग्रेसनेही जिल्हा ...
विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी चालविली होती. त्यात भारतीय जनता पक्षाने चांगलीच आघाडी घेतली, तर राष्टÑवादीनेही तयारीला वेग दिला आहे. ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले असून, पुन्हा विधानसभा गाठण्याच्या इराद्याने विद्यमान आमदारांनी जोरदार तयारी चालविली आहे़ दुसरीकडे नवीन उमेदवारही राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सरसावले आहेत़ ...