शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
4
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
5
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
6
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
7
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
8
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
9
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
10
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
11
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
12
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
13
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
14
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
15
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
16
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
17
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
18
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
19
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
20
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरची भुयारी गटार योजना मार्गी

By admin | Updated: March 27, 2016 02:21 IST

महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा

- सदानंद नाईक,  उल्हासनगर
महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे. मान्यता मिळताच निविदा काढून योजनेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.
शहरात १९८४ ते १९९३ दरम्यान महाराष्ट्र पाणीपुरवठा मलनि:सारण योजनेंतर्गत पालिकेने भुयारी गटार योजना राबवली. १९९३ मध्ये तीन लाख ६० हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरून २८ दशलक्ष लीटर क्षमतेची भुयार गटार योजना राबवली. आता लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या घरात गेली आहे. ती पुढील दहा वर्षांत आणखी वाढेल.
परिणामी, सध्याच्या गटारांची क्षमता संपली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. गटारांच्या दुरुस्तीवर पालिकेने दोन कोटी रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
त्यामुळे महापालिकेने नवीन भुयारी गटार योजना आखली. महापालिकेने सुरुवातीला २५४ कोटींची योजना केंद्र सरकारकडे पाठवली. २०२१ मधील १२ लाख लोकसंख्या गृहीत धरून १३५ दक्षलक्ष लीटर क्षमतेची योजना तयार केली आहे. त्यात नव्याने सुधारणा केल्याने २५४ कोटींची योजना आता ४०० कोटींवर गेली आहे. त्यासाठी २३३ कोटी रुपयांच्या निधीला महाराष्ट्र सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे.

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा
महापालिका पाणीपुरवठा विभागांतर्गत भुयारी गटार विभाग येतो. या विभागातर्फे गटारांची निगा व दुरुस्ती केली जाते. या विभागाकडे साफसफाईसाठी प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही.
त्यामुळे त्यांना खाजगी कंत्राटदारावर अवलंबून
राहावे लागत आहे. तसेच खडेगोळवली येथील बंद पडलेल्या मलनि:सारण केंद्रावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. या प्रकारच्या चौकशीची मागणी वारंवार झाली आहे. मात्र, पालिकेने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.

सांडपाणी थेट वालधुनी नदीत
महापालिकेचे २८ दशलक्ष लीटर क्षमतेचे खडेगोळवली येथील मलनि:सारण केंद्र
नावालाच सुरू आहे. शहरातील दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वालधुनी नदीत सोडले जात आहे.
शहरातील सांडपाण्यासह जीन्स कारखाने व अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखाने विषारी सांडपाणी सोडत असल्याने वालधुनी नदी प्रदूषित झाली आहे.