शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, भिवंडीला भातसाचा हात

By admin | Updated: December 29, 2016 02:56 IST

भातसा धरणातून मुंबईला पाणी दिल्यानंतर उरलेल्या पाण्यातून ठाणे, भिवंडी आणि कल्याण तालुक्याला जादा पाणी देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

ठाणे : भातसा धरणातून मुंबईला पाणी दिल्यानंतर उरलेल्या पाण्यातून ठाणे, भिवंडी आणि कल्याण तालुक्याला जादा पाणी देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. ठाण्यात पुढील महिन्यात, तर भिवंडीत सहा महिन्यांनी होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वाढीव पाणीसाठ्याचा दिलासा मिळणार आहे.शहापूर तालुक्यातील ज्या गावांना सध्या भातसातून पाणी पुरवले जाते, त्यांचा कोटा वाढवावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले. शहापूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मुमरी धरणाच्या कामाला गती देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, तर भावली धरणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावल्याचे आमदार किसन कथोरे यांनी निदर्शनास आणले. भातसा हा शहापूर तालुक्यातील मोठा प्रकल्प असून शहापूरला उन्हाळ््यात तीव्र पाणीटंचाई सोसावी लागते. त्यामुळे शहापूरला पाणी देण्यासाठी काही लघु प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. भातसा प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शिंदे यांच्यासमवेत आमदार शांताराम मोरे, रवींद्र फाटक, किसन कथोरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अधीक्षक अभियंता लोहार उपस्थित होते. ठाणे आणि भिवंडीला भातसातून किती जादा पाणी देता येईल, त्याचे नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी सुचवले. भातसापासून सहा किमी अंतरावर मुमरी धरण बांधल्यास त्यातून अतिरिक्त ७२.५० दलघमी पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली. शहापूरच्या पाणीप्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने गुरूत्त्वाकर्षणावर आधारित भावली धरण मार्गी लागेल, असा विश्वास आमदार किसान कथोरे यांनी व्यक्त केला. प्रत्येक महापालिका, नगरपालिका आदी यंत्रणा नेमके किती पाणी उचलतात, त्यांना पाण्याचा किती उपयोग होतो, याची माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे मंडळाला दिले. (प्रतिनिधी)मुमरी धरणाला शेतकरी, आदिवासींचा विरोध कायमभातसा धरणापासून साधारण दोन किमी अंतरावर मुमरी नदीवर धरण बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आधीच्याच धरण प्रकल्पग्रस्तांचे पुर्वसन झालेले नाही, हे दाखवून देत मुमरी घरणाविरोधातही संघर्ष समिती स्थापन झाली आहे. या धरणाखाली ५७३ हेक्टर जमीन बुडेल, तर ५४ कुटुंबे विस्थापित होतील, असा समितीचा दावा आहे. सारंगपुरी, खरा, रूमाल, अवकळवाडी, कोठारा गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय दुर्मिळ वनस्पतीही पाण्याखाली गेल्याने-वनसंपदेचा ऱ्हास होणार असल्याने आदिवासींची उपजीविका हिरावली जाईल, असा त्यांचा दावा आहे. भूकंपप्रवण क्षेत्रामुळे ब्रिटिशांच्या काळात या धरणाचा प्रस्ताव बारगळला होता. या धरणाची लांबी १२४० मीटर इतकी असून उंची ४६ मीटर असेल. त्यातून शेती, पिण्यासाठी पाणी देण्याची योजना असली, तरी या भागातील प्रकल्पांमुळे शेती नष्ट होत असल्याने पिण्यासाठीच या धरणातील पाण्याचा सर्वाधिक वापर होण्याची शक्यता आहे. भावली धरणाच्या श्रेयाचा वाद इगतपुरीजवळील भावली धरणातून शहापूरला पाणी देण्याचा मुद्दा गेले वर्षभर गाजतो आहे. त्या धरणासाठी राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना पाठपुरावा केला. त्यासाठी उपोषणाचा इशारा दिला. सभागृहात विषय मांडला. मुख्यमंत्र्यांकडे त्याचे सादरीकरण केले. आता भाजपाच्या नेत्यांनीही हा विषय हाती घेतला असून मुख्यमंत्री हा प्रकल्प मार्गी लावत असल्याने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.