१५ मे आणि १६ मे रोजी सावली साथ सोडणार! घेता येणार 'शून्य सावली'चा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:56 IST2026-05-07T13:55:44+5:302026-05-07T13:56:10+5:30
दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास घेता येणार अनुभव

१५ मे आणि १६ मे रोजी सावली साथ सोडणार! घेता येणार 'शून्य सावली'चा अनुभव
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबईत शुक्रवार १५ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास आपली सावली नेमकी पायाखाली येणार असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. ठाणे, डोंबिवली,कल्याण, बोरिवली येथे हाच अनुभव शनिवार १६ मे रोजी दुपारी १२.३५ वाजता घेता येईल. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त येथूनच हा अनुभव घेता येऊ शकतो. वर्षातून दोनवेळा सूर्य मध्यान्ही दुपारी बरोबर डोक्यावर येतो. दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्याने अनुभव घेता येत नाही. आपल्या गावच्या अक्षांश इतकी सूर्याची क्रांती (डिक्लिनेशन) झाले की त्यादिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर 'शून्य सावली'चा अनुभव घेता येतो.