शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
3
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
4
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
5
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
6
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
7
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
8
आईसारखा की बाबांसारखा? विकीच्या वाढदिवशी कतरिनाने शेअर केला छोट्या विहानचा फोटो
9
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
10
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
11
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
12
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
13
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
14
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
15
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
16
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
17
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
18
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
19
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
20
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याच्या पाईपलाईनसाठी प्रलोभने

By admin | Updated: March 8, 2016 01:41 IST

तारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून नेण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना नोकरी-पैशाची प्रलोभने दाखवून

हितेन नाईक,  पालघर
तारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून नेण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना नोकरी-पैशाची प्रलोभने दाखवून चुकीच्या पद्धतीने करारनामे काही लोकांकडून लिहून घेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही जागृत शेतकऱ्यांनी आजही हया प्रलोभनला बळी न पडता हा डाव उधळूण लाऊन आपल्या शेतातून पाइपलाइन टाकण्यास मज्जाव केला आहे.
तारापुरच्या औद्योगिक वसाहती मधील कारखान्या मधून बाहेर निघणारे प्रदूषित सांडपाणी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) पाठवले जाते. तेथून हे प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करुन ते नवापूर मधून गेलेल्या पाइपलाइन मधून थेट नवापुर-अलेवाडीच्या समुद्रात ४० वर्षापूर्वीपासून सोडले जात होते. ही पाइपलाइन जिर्ण आणि नादुरुस्त झाल्याने या पाइपलाइन मधून निघणारे प्रदूषित सांडपाणी नवापूर, पाम इ.भागातील शेतात, बागायती क्षेत्रात शिरुन हे क्षेत्र नापिक बनले आहे. त्या मुळे मागील १५-२० वर्षापासून इथल्या शेतकऱ्यानी भात पीक ,भाजीपाला पिक घेणे बंद केले आहे. त्या मुळे अनेकांना आपल्या जमीनी कवडी मोल दराने विकण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते.
१५ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान प्रदूषित पाण्याची पाइपलाइन फुटून लाखो लीटर सांडपाणी अनिल मेहेर इ.सह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, विहिरित घूसले होते. या संदर्भात एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या नंतर १९ सप्टेंबरला ४ दिवस उशिराने प्रदुषण मंडळाचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी मेहेर यांच्या बागायतीत पोहचले. त्यावेळी कुणीही पंच न सापडल्याचे कारण देऊन अधिकारी निघून गेले. त्या नंतर २४ सप्टेंबर रोजी म्हणजे १० दिवसांनी या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु मधल्या काळात मुसळधार पाऊस पडल्याने बागायती क्षेत्रासह विहिरित गेलेल्या प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी झाली होती. त्याच पाण्याचे सॅम्पल प्रदुषण मंडळाने नेल्याने येणारा रिपोर्ट हा एमआयडीसी आणि प्रदुषण मंडळाच्या बाजूने येऊन प्रदूषणाची तीव्रता कमी असल्याची नोंद येणार आहे. त्यामुळे हेतु पुरस्कर मुद्दाम पंचनामा उशिरा करण्यात आल्याचा आरोप मेहेर यांनी केला आहे. याघटने मुळे मेहेर यांच्या बागायती मधील ७९ नारळ झाडे, २४ आंबा, ४१ केळी, २१ फणस अशी सुमारे २८४ झाडांच्या मुळाशी प्रदूषित पानी शिरून झाडे मरणावस्थेत पोहोचली आहेत. ६ महिने उलटून ही त्याना कुठलाही नुकसान भरपाई मिळालेली नाही.