शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
3
"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
4
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
5
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
6
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
7
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
8
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
9
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
10
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
11
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
12
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
13
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
14
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
16
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
17
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
18
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
19
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
20
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६०० रुग्णांचा शोध; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 01:45 IST

ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ६०० रुग्णांचा शोध मंगळवारी घेण्यात आला. या रुग्णांसह आतापर्यंत एक लाख ४९ हजार ४४० रुग्ण जिल्ह्यात झाले आहेत. तर ३४ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात तीन हजार ९८३ मृतांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून उघड झाली.ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ३९६ रुग्ण नव्याने आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या ७३९ झाली. उल्हासनगरला ३० रुग्ण नव्याने आढळल्याने शहरात आतापर्यंत आठ हजार ३४९ बाधितांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्यामुळे २५५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३५ रुग्ण नव्याने सापडले आहेत.मीरा-भार्इंदरमध्ये १७७ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथ शहरात ६० रुग्ण आढळून आले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता पाच हजार ५८६ बाधित तर २०९ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये ८१ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण पाच हजार १६७ झाले आहेत.नवी मुंबईत ४०५ रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत तब्बल २७१८२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के झाले आहे. नवी मुंबईमध्ये मंगळवारी ३११ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३१३१६ झाली आहे. शहरात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६८ दिवसांवर पोहचले असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरारमध्ये २६८ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात मंगळवारी नालासोपारा शहरात दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर बाधित रुग्णसंख्या २६८ ने वाढली. मात्र दिलासादायक म्हणजे दिवसभरात २०७ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार ७९९ वर पोहोचली असून वसई-विरार २० हजारच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.रायगडमध्ये ६४६ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी ६४६नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीनोंद झाली आहे. त्यामुळेबाधितांची संख्या ३८ हजार ४१९ वर पोचली आहे.दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण १०३७ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, ३० हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस