Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 08:11 IST

Open in App
1 / 7

अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी धुव्वा उडवला. अवघ्या ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावा करून तिलक वर्मा या विजयाचा शिल्पकार ठरला.

2 / 7

तिलक वर्माने तुफान फटकेबाजी करून मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण त्याचसोबत डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारनेही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

3 / 7

अश्वनीने ४ षटकांत २४ धावांमध्ये ४ बळी घेतले. शुभमन गिल, शाहरुख खान, राहुल तेवतिया आणि रशीद खान यांच्या विकेट्स घेत त्याने संपूर्ण सामन्याचे चित्र पालटून टाकले.

4 / 7

अश्वनी कुमारने यंदाच्या हंगामातील त्याच्या पहिल्याच सामन्यात धमाका केला. त्याच्या या यशामागे ३० रुपयांची एक प्रेरणादायी कथा आहे. नेमका काय आहे तो प्रवास, जाणून घेऊया.

5 / 7

अश्वनी कुमार पंजाबचा असून त्याने मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले. सरावासाठी अश्वनी कुमार तब्बल ११ किलोमीटर सायकल चालवत असे.

6 / 7

वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षण घेताना दूरवर सायकल चालवत जाणे आणि क्रिकेट सराव दोन्ही जमणे शक्य होत नव्हते. अशावेळी तो दिवसाला ३० रुपयांच्या शेअर ऑटोरिक्षाने मैदान गाठत असे.

7 / 7

याच ३० रुपयांच्या जोरावर अश्वनीने IPLमध्ये आपले स्थान निर्माण केले. क्रिकेटसाठी त्याने शिक्षण सोडले.१२वी पर्यंत शिकून झाल्यानंतर त्याने आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवरच केंद्रित केले.

टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सतिलक वर्मागुजरात टायटन्स