शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

ऐन थंडीत पाणी टंचाईचे चटके; उल्हासनगरला टँकरने पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 1:02 AM

वितरण योजनेचा उडाला फज्जा

उल्हासनगर : गेल्यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने नद्या, धरणे भरलेली असल्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, ऐन थंडीतच शहरात टंचाईचे चटके बसणार हे स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सिद्ध झाले आहे. टंचाईग्रस्त भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असून पाणीवितरण योजनेचा फज्जा उडाला आहे. शहर टँकरमुक्त होण्याऐवजी कोट्यवधींची उधळण होणार आहे.

उल्हासनगरमध्ये पाणीप्रश्न ऐरणीवर आल्यानंतर मुबलक व नियमित पाणीपुरवठ्यासह टँकरमुक्त शहराचे स्वप्न ३०० कोटींची पाणीवितरण योजना राबविताना तत्कालीन शिवसेना-भाजपने दाखविले होते. मात्र, महापालिका व राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे वितरण योजनेचा फज्जा उडाला असून पाणीगळती आजही ‘जैसे थे’ आहे.

शहराच्या पश्चिम भागातील शांतीनगर, खेमानी परिसर, करोतियानगर तसेच पूर्वेतील सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प, महादेवनगर, संतोषनगर, प्रेमनगर टेकडी, कैलास कॉलनी, गुलशननगर आदी परिसरांत एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. या भागात झोपडपट्टींचा समावेश असून श्रीमंत असलेल्या भागात दिवसातून तीन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने आम्ही गरीब म्हणून कमी पाणी दिले जाते का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. काही भागांत अर्धा तास पाणी दिले जाते.

पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण झाल्यावर महापालिकेने नवीन हातपंप बसवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला. मात्र, अस्तित्वात असलेल्या हातपंपाची देखभाल न झाल्याने अर्धेअधिक हातपंप नादुरुस्त असून बहुतांश हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र, नाइलाजास्तव नागरिक हातपंपाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत आहेत.

ऐन हिवाळ्यात शहरातील विविध विभागांतून पाणीटंचाईची ओरड सुरू झाल्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. तर, गेल्यावर्षी फेबु्रवारी ते आॅक्टोबर महिन्यांत टँकरवर २६ लाखांचा खर्च केल्याचे उघड झाले. अखेर, स्थायी समितीने प्रतिटँकरमागे ८०५ रुपये आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तसेच पाणीगळती थांबविण्यासाठी व जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसाठी ८५ लाखांच्या निधीलाही स्थायी समितीने मान्यता दिली. मात्र, किती व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले व किती ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली, याची संख्या निश्चित नाही. तसेच दरवर्षी झोपडपट्टी भागात जलवाहिन्या टाकण्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो.पाणीपुरवठा विभाग वादातपाणीपुरवठा विभाग नेहमी वादात राहिला असून खेमानी नाला योजना व भुयारी गटार योजनेंतर्गत वडोलगाव व शांतीनगर येथील मलनि:सारण केंद्र ३१ डिसेंबरपूर्वी सुरू होण्याचे वचन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांच्या उपस्थितीत दिले होते. मात्र, अद्यापही योजना पूर्ण झाली नसून दोन महिने योजना पूर्ण होण्यासाठी लागतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी