शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत परतीच्या पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 17:14 IST

Bhiwandi : परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी तालुक्यात सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. शेतात पीक जोमाने आल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र शेतातील ही भातपिके शेतात डौलाने डोलत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हैदोस घालीत बळीराजाच्या शेतातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला असून परतीच्या पावसामुळे भिजलेली पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. 

शेतात कुटुंबियांसह काबाडकष्ट करून पिकविलेले व हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हिरावल्याने हे पीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क रस्त्याच्या दुभाजकावर पीक आणून ठेवली आहेत. भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली , वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव ,मुठवळ,चिंबीपाडा,कुहे ,धामणे ,खारबांव ,पाये ,पायगांव ,खार्डी ,एकसाल ,सागांव ,जुनांदुर्खी ,टेंभवली ,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा ,बासे ,मैदे ,पाश्चापूर, वडुनवघर , खारबाव ,  या भागात हजारो एकर भातशेती पिकविली जात असून यंदा भातपिक ही चांगले आल्याने शेतकरी आनंदित होता मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला भात पिकाचा घास हिरावून मातीमोल केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून तब्बल १६ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.  तर शेतात कापून ठेवलेले भाताचा एकएक दाणा वाचवण्यासाठी भिजलेले भात पीक सुकवण्यासाठी चक्क भिवंडी - वाडा रोडवरील रस्ते दुभाजकावर ठेवण्याची  शेतकऱ्याची धडपड पाहावयास मिळत आहे . शेतकरी हवालदिल झालेला असताना कृषी व महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने जगावं की मरावं अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

दरम्यान, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी शनिवारी अंबाडी खरिवली परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे म्हणत त्यांना दिलासा दिला व कृषी व महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत करण्याचे निर्देश आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज आपण स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून तसे निर्देश देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत . अशी प्रतिक्रिया भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीFarmerशेतकरी