शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:53 IST

आयपीएचच्यावतीने प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

ठळक मुद्देप्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सौमित्र कुलकर्णी  यांनी गीत सादर करुन कार्यक्रमाची केली सुरूवात नैराश्य माणसाला जगण्यापासून परावृत्त करते - डॉ. आनंद नाडकर्णी

ठाणे: आयपीएचच्यावतीने प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज व्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी सप्तसोपान डे केअर सेंटर येथे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शुभा थत्ते, ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार, कवयित्री, लेखिका नीरजा, उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस, शिरीन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.

     सौमित्र कुलकर्णी  यांनी गीत सादर करुन कार्यक्रमाची सुरूवात केली. लेखक प्रवीण कुलकर्णी यांनी आपले मनोगत मांडले. ते म्हणाले की, मला जे सांगायचे होते ते या पुस्तकात मी मांडले आहे. माझ्या आयुष्यातील निवडक घटना या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचे लिखाण सुरू केले तेव्हा नेमके काय सांगायचे हा प्रश्न माझ्या समोर होता. हे आत्मचरित्र नाही तर मला नैराश्यात जाण्याचा अनुभव ते तिथून बाहेर पडण्याचा अनुभव याचा प्रवास आहे. हे आत्मशोध आहे. काय लिहायचं यापेक्षा काय टाळायचं हे मला जास्त महत्त्वाचे वाटले. डॉ. नाडकर्णी म्हणाले की, नैराश्य माणसाला जगण्यापासून परावृत्त करते. पण एक ड्राईव्ह असते की यातून बाहेर पडायचे, ड्राईव्ह आणि नॉन ड्राईव्हची मनात कुस्ती सुरू असते. मानसीक आरोग्य किंवा मानसीक आजार याबद्दल समाजात कलंक आहे असे असताना कुलकर्णी यांचे आत्मकथन पुढे येणे हे एक धैर्य आहे. हे पुस्तक वैयक्तीक पातळीवरचा लढा आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार म्हणाल्या की, गेल्या १० ते १५ वर्षांत जागरुकता वाढल्याने शारिरीक - मानसीक अपंगतव् किंवा उणीवा अशावर लेखण करण्याची संख्या वाढलेली दिसत आहे. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे की, चार - पाच व्याधींनी ग्रासलेले असताना ते या व्याधींना हसत खेळत सामोरे गेले. कवयित्री, लेखिका नीरजा म्हणाल्या की, पत्रं हा जुना प्रकार आहे. पत्रातला संवाद एकाशी असतो परंतू या पुस्तकातील लेखकाने सर्वांशी संवाद साधला आहे. कादंबरी होता होता राहिलेले हे पुस्तक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शुभा थत्ते यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. दरम्यान, प्रकाशक मोधा राजहंस यांनी मनोगत व्यक्त केले तर शिरीन कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई