शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

‘गुजराती- मराठी वाद नव्हे तर शहा- पैठणकर वैयक्तिक वाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:26 PM

नौपाडयात एका क्षुल्लक कारणावरुन शहा आणि पैठणकर या दोन कुटूंबामध्ये झालेला वाद हा त्यांचा वैयक्तिक असून त्याला गुजराथी- मराठीचा रंग दिला जाऊ नये. गुजराथी समाजाचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा ठाणे शहर गुजराथी समाजाच्या वतीने मंगळवारी एका पत्रकार परिषेदतून ठाण्यात करण्यात आला.

ठळक मुद्देगुजराथी समाजाचे स्पष्टीकरण ठाण्यात घेतली पत्रकार परिषदगुजराथी समाजाचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा केला दावा

ठाणे : नौपाड्याच्या विष्णुनगर भागातील रहिवाशी राहुल पैठणकर आणि विकासक हसमुख शहा या दोन ठाणेकरांमधील वाद हा वैयक्तिक असून त्याला गुजराथी आणि मराठी असा रंग दिला जात आहे. गुजराथी समाजाचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा ठाणे शहर गुजराथी समाजाच्या वतीने सुरेश गडा, प्रकाश नरसाणा आदी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केला.पैठणकर आणि शहा वास्तव्यास असलेल्या विष्णुनगर येथील ‘सुयश’ सोसायटीत इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा वाद उद्भवला होता. याच वादातून पैठणकर यांना शहा पिता पुत्रांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचवेळी ‘मराठी - घाटी तुला नौपाड्यात रहायची लायकी नाही’ असे आक्षेपार्ह उद्गारही शहा यांनी काढले होते. याचीच गंभीर दखल घेऊन मनसेच्या अविनाश जाधव यांनी शहा याला जाहीर माफी मागायला भाग पाडले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात शहाविरुद्ध सोमवारी गुन्हाही दाखल झाला. काँग्रेसनेही या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात गुजराथी समाजाच्या वतीने सुरेश गडा, जितू मेहता, दीपक भेदा आणि प्रकाश नरसाणा आदी व्यापारी तसेच गुजराथी बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही हसमुख शहा याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नसून हा वाद मराठी गुजराथी या दोन समाजांचा नसल्याचे स्पष्ट केले.ठाणे शहरात गेली अनेक वर्षे मराठी आणि गुजराथी समाज सलोख्याने आणि एकत्रित वास्तव्याला आहे. वास्तविक, गुजराथी समाज हा कोणत्याही इतर समाजाचा द्वेष किंवा राग करीत नसून सर्वांशी आदराने आणि मित्रत्वाने रहातो आहे. गेल्या आठवड्यात दोन ठाणेकरांमध्ये झालेला मारहाणीचा प्रकार ही त्यांची वैयक्तिक बाब असून समाजाचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गुजराथी समाज हा ठाणेकर म्हणून ठाण्यात वास्तव्य करीत आहे.भविष्यात असा कोणाचाही वैयक्तिक प्रकार घडल्यास त्यासाठी गुजराथी समाजाला वेठीस धरू नये. तसेच त्याला राजकीय स्वरुपही देऊ नये, असे आवाहनही यावेळी या पदाधिकाऱ्यांनी केले.शहाच्या कारने महिलेलाही चिरडलेहसमुख शहा हा यापूर्वीही कासारवडवली येथील अपघात प्रकरणात वादग्रस्त ठरला आहे. १५ मे २०१९ रोजी त्याच्या कारने घोडबंदर रोड येथे तीन रिक्षांना धडक दिली होती. या अपघातामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वंदना भगत (४४,रा. पानखंडा गाव) या महिलेला जोरदार धडक बसली होती. त्यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तर रिक्षाचालकासह चौघेजण जखमी झाले होते. या प्रकरणातही हसमुख याला त्यावेळी कासारवडवली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात तो जामीनावर सुटला आहे.

टॅग्स :thaneठाणेSocial Mediaसोशल मीडिया