शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

Maharashtra Bandh: मावळ गोळीबाराला NCP चं समर्थन? जितेंद्र आव्हाड म्हणतात, नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 11:33 IST

Maharashtra Bandh: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मावळ येथील गोळीबारासंदर्भात केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलेय

ठळक मुद्देमावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होतासत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज दिसून येतोतर फडणवीसांची माणुसकी दिसली असती

ठाणे: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Incident) येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Bandh) राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप, मनसे अशा पक्षांनी या बंदला विरोध करताना ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मावळ येथील गोळीबारासंदर्भात केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर देत, मावळ येथील गोळीबार पोलिसांनी केला होता. नेत्याच्या मुलाने नाही, असे म्हटले आहे. 

लखीमपूर खेरीच्या घटनेची तुलना जालियनवाला बागशी केल्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का? राजस्थानमध्ये चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना तुडवले गेले, काँग्रेस सरकारने बेछूट मारले, त्यावर का बोलत नाही? हे राजकीय वक्तव्य करत आहेत, हे राजकीय पोळी भाजण्याचे काम आहे. शेतकऱ्यांवर खरा अन्याय यांनीच केलाय, अशी टीका फडणवीसांनी केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर पलटवार केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता

मावळची दुर्घटना घडली. त्याची चौकशी केली. तो गोळीबार कसा गरजेचा होता, हे न्यायाधीशांनी मान्य केले. तुम्हाला संधी दिली होती ना तेव्हा. तुम्ही विरोधी पक्षात होता ना. त्यामुळे मावळचे उदाहरण देऊ नका. मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. पोलिसांच्या हातातून बंदुका घेऊन कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता. इथे या देशाच्या गृहराज्यमंत्र्याचा पोरगा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून चक्क गाडी घेऊन जातो. मावळचा गोळीबार हा पोलिसांचा होता. पोलीस आणि सामान्य जनतेत काही फरक आहे की नाही, असा प्रतिप्रश्न आव्हाड यांनी केला आहे. 

सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज दिसून येतो

अमानवी कृत्याचे दुःख होणे हे माणुसकीचे लक्षण आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज हा त्या घटनेतून दिसून येतो. गरीब शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. मागून जीप आणून अंगावर घालायची आणि नऊ जणांना चिरडून मारायचे यांच्याबद्दल वाईट वाटणारच नसेल, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेतकरी कुठलाही असो शेवटी तो या देशाचा शेतकरी आहे ना? उत्तर प्रदेशातील त्याच भागात सर्वाधिक गहू उगतो. तुमच्या घरातील पोळ्या या तिथूनच आलेल्या गव्हाच्या बनवल्या जातात. तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच या सर्व घटनेतून दिसून येते, या शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

तर फडणवीसांची माणुसकी दिसली असती

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात आहेत. सत्ताधाऱ्यांनी बंद केला आहे. त्यामुळे ते बोलणारच. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शेवटी ते विरोधक आहेत. पण जे चिरडून मारले गेले त्यांच्याबद्दल संवेदना दाखवल्या असत्या तर त्यांच्यातली माणुसकी दिसली असती. जिवंतपणा दिसला असता, असा टोलाही आव्हाडांनी लगावला.  

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा