शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

भाजपा सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 5:03 PM

फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला.

कल्याण - फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. 

शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सरचिटणीस सुभाष पिसाळ, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्यासह युवा नेते महेश तपासे, राजेश शिंदे, दत्ता वङो, गुलाब वङो, जानू वाघमारे, प्रल्हाद भिल्लारे, सारीका जाधव सहभागी झाले होते. महंमद अली चौकात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. सरकारने जनहिताच्या विरोधात निर्णय घेऊन सगळा गोंधळ घालून ठेवला असल्याने सबळ वाद्य वाजविणारे गोंधळी मोर्चात आणले होते. या सबळ वाद्यावर सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेधार्थ गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे हा एक प्रकारे गोंधळी मोर्चा सगळ्य़ांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. 

भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. यूपीए सरकारच्या काळात स्वस्त असलेला जीवनावश्यक गॅस सिलिंडर हा महागला. त्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाचे सरकार उलथवून लावा असे आवाहन पिसाळ यांनी केले. तर उपाध्यक्ष हिंदूराव यांनी सांगितले की, भाजपा सरकार जातीयवादी आहे. त्याच जातीयवादी सरकारच्या मांडीला मांडी लावून रामदास आठवले बसले आहेत. सत्तेत सहभागी होऊन मंत्रीपद भोगत आहेत. समाजापेक्षा त्याना मंत्री पदाची जास्त काळजी आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत दलित समाजाने भाजपाला चांगला धडा शिकविला पाहिजे असे आवाहन केले. मोर्चातील शिष्टमंडळाने कल्याण तहसीलदार अमित सानप यांना सरकारच्या निषेधार्थ निवेदन दिले. राष्ट्रवादीचा भावना सरकार दरबारी पोहचविल्या जातील असे आश्वासन सानप यांनी शिष्टमंडळास दिले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाkalyanकल्याण