शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 4:07 AM

सत्तेत आल्यास जातीय जनगणना, आर्थिक सर्वेक्षणाची दिली ग्वाही

पाटण (गुजरात) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे. मात्र लोकांना हे सर्व माहिती आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली तर मागासवर्गीय, आदिवासी, खुल्या गटातील गरीब आणि ओबीसींचा सहभाग वाढवण्यासाठी प्राधान्याने देशव्यापी जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाहीदेखील गांधी यांनी सोमवारी दिली.

कॉंग्रेसचे उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या समर्थनार्थ उत्तर गुजरातमधील पाटण शहरात एका प्रचारसभेत गांधी बोलत होते. “देशातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचा समावेश आहे, परंतु कॉर्पोरेट, प्रसार माध्यमे, खासगी रुग्णालये, खासगी विद्यापीठे किंवा सरकारी नोकरशहांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व तुम्हाला आढळणार नाही. केंद्रातील कामकाजाच्या प्रमुखपदी असलेल्या ९० आयएएस अधिकाऱ्यांपैकी फक्त तीनच मागासवर्गीय आहेत आणि त्यांनाही नगण्य पदे देण्यात आली आहेत.

भाजपने विषमता आणली

भाजपने १० वर्षांच्या राजवटीत देशात संपत्तीची विषमता आणली. देशातील केवळ २२ जणांकडे लोकसंख्येच्या ७० टक्के इतकी संपत्ती आहे, असा आरोपही त्यांनी केला. तत्पूर्वी राहुल यांची छत्तीसगडमधील बिलासपूर येथेह प्रचार सभा झाली. त्यातही त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली.

अग्निवीर योजना बंद करणार

भाजपला शेतकरी, गरिब, मागासवर्गीयांच्या फायद्याच्या योजना बंद करायच्या आहेत. खासगीकरण आणि अग्निपथ-अग्निवीर लष्करी भरती योजना ही आरक्षण संपवण्याची या सरकारची दोन साधने आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यावर अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे गांधी यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४