शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

Vidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 6:01 AM

Maharashtra Assembly Election 2019 युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे.

ठाणे : युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लेखी करार होऊनही भाजपने शब्द पाळला नाही. रिपाइंला सत्तेत १० टक्के वाटा दिला नाही. यंदा भाजप-सेनेची युती झाल्यास पक्षाला २३ जागा आणि युती झाली नाही तर ५० जागा देण्याची मागणी करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १० जागांवरही रिपाइं पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दावा केला.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने भाजपसोबत युती केल्याने भाजपला मागासवर्गीयांजवळ जाण्याची संधी मिळाली आहे. देशभरातील मागासवर्गीयांचे पक्ष भाजपजवळ जात आहेत. आठवले भाजपसोबत गेल्यानंतर मागासवर्गीयांचे नेते रामविलास पासवान, धनगरांचे नेते महादेव जानकर आदी भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे भाजपने रिपाइंला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे सांगून बारशिंग यांनी राज्यात २३ जागांची मागणी केली.सेना-भाजप युती झाली नाही तर, भाजपने रिपाइंला ५० जागा सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपसोबत लेखी करार झाला असतानाही, तो करार पाळत नाहीत, याची खंत वाटत असल्याचेही ते म्हणाले.बुधवारी सायंकाळी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे, नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ, भिवंडी अध्यक्ष महेंद्र गायकवाड, बाळाराम गायकवाड, महिला आघाडीच्या मनीषा करलाद, आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, ऐरोली आदी जागांवर रिपाइंने दावा केला आहे. नालासोपारा मतदारसंघाचीही जागा या पक्षाने मागितली आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019