शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

‘अशोक लीला’च्या सांडपाण्यामुळे स्थानिक त्रस्त

By admin | Updated: September 29, 2015 00:59 IST

वाडा गावातील अशोकवन या भागात असलेल्या अशोकलीला या इमारतीचे सांडपाणी आजुबाजूला सोडले जात असल्याने स्थानिक नागरीक उग्रवासाने व त्यावर होणाऱ्या डासांमुळे हैराण झाले आहेत

वाडा : वाडा गावातील अशोकवन या भागात असलेल्या अशोकलीला या इमारतीचे सांडपाणी आजुबाजूला सोडले जात असल्याने स्थानिक नागरीक उग्रवासाने व त्यावर होणाऱ्या डासांमुळे हैराण झाले आहेत. वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्याकडे गांभीर्याने बघीतले जात नसल्याने नागरीक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. येत्या आठ दिवसात सांडपाण्याची व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा येथील नागरीकांनी दिला आहे. या इमारतीतील सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेली टाकी नादुरूस्त झाल्याने शौचालय, स्वच्छतागृहातील सांडपाणी आजुबाजूला पसरते. सांडपाण्याच्या उग्र वासामुळे येथील नागरीकांना नाक मुठीत घेवून दिवस कंठावे लागत आहेत. तर डासांमुळे येथील नागरीक नेहमीच आजारी पडतात अशी माहिती नागरीकांनी दिली.या संदर्भात २८ जानेवारी २०१३ च्या झालेल्या ग्रामसभेतही हा विषय चर्चेला येऊन सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून त्यावर काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप निवेदनात नागरीकांनी केला आहे.गेल्या दोन वर्षापासून उंबरठे झिजवूनही या प्रश्नाकडे पंचायत गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गेल्या आठ दिवसात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न केल्यास बेमुदत उपोषण आंदोलनास बसण्याचा इशारा येथील नागरीकांनी दिला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत बिल्डरला वेळोवेळी नोटीसा काढण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)