शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले दुचाकीस्वाराला जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 5:04 AM

कल्याण-बदलापूर रस्त्यावरून दुचाकीने चाललेले राजेंद्र पांढरे (४५) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले.

ठाणे/ अंबरनाथ : कल्याण-बदलापूर रस्त्यावरून दुचाकीने चाललेले राजेंद्र पांढरे (४५) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव यांनी बेशुद्ध झालेल्या राजेंद्र यांना हृदयविकारावरील प्राथमिक उपचार देऊन शुद्धीवर आणून जीवनदान दिले.राजेंद्र यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर छाया रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव हे ११ जुलैच्या रात्री पोलीस वाहनातून पोलीस शिपाई गायकवाड आणि संदीप फडतरे यांच्यासमवेत गस्त घालत होते. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील एका किराणा दुकानाजवळ राजेंद्र पांढरे यांना दुचाकीवरून जाताना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. यावेळी तेथे असलेल्या उपनिरीक्षक जाधव यांनी पांढरे यांच्या छातीवर काही काळ दाब देऊन त्यांना प्रथम शुद्धीवर आणले आणि त्यानंतर तातडीने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, पांढरे यांच्या कुटुंबीयांना त्याबाबतची माहिती दिल्याची माहिती पोलीसांनी दिली.>प्रशिक्षणाचा झाला फायदाराजेंद्र पांढरे दुचाकीवरून जाताना त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. ते पाहून उपनिरीक्षक जाधव यांना पाढरेंना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे वाटले. त्यांनी हृदयविकारावरील प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण घेतले असल्याने पांढरे यांच्या छातीवर काही काळ दाब देऊन त्यांना प्रथम शुद्धीवर आणले.प्रसंगावधान दाखवल्याने कौतुकप्रसंगावधान राखून या दाखवलेल्या कामगिरीबद्दल उपनिरीक्षक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे आदींनी अभिनंदन केले आहे.