शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

आदिवासी नागरिकांना मोफत तुरडाळ आणि खाद्य तेल वाटपाच्या योजनेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 8:20 AM

'भूक' हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे त्यामुळे या भूकेवर उपाय म्हणून विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार व मोखाडा तालुक्यातील ४०१९२ आदिवासी नागरिकांना २ किलो तुरडाळ व एक किलो खाद्य तेलाचा लाभ मिळणार आहे.

जव्हार: पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येकी २ किलो तुरडाळ व १ किलो खाद्य तेल मोफत देण्याच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ आज राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. कुपोषणामुळे जव्हार मोखाडा तसेच राज्यातील इतर भागात शेकडो बालकांच्या मृत्युमुळे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. 

त्यावेळी 'भूक' हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे त्यामुळे या भूकेवर उपाय म्हणून विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार व मोखाडा तालुक्यातील ४०१९२ आदिवासी नागरिकांना २ किलो तुरडाळ व एक किलो खाद्य तेलाचा लाभ मिळणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाला  ६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे ही  योजना ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण देशात पहिल्यांदाच जव्हार व मोखाडा येथे अशाप्रकारची योजना राबविण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. यावेळी मार्ग दर्शन करताना "आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जर एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराने तुरडाळ किंवा खाद्य तेल काळ्या बाजारात  विकण्याचा प्रयत्न केला तर अशा दुकादारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार (essential commodities act) गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंडित यांनी दिले. 

आदिवासी नागरिकांनची क्रयशक्ती कमी असल्यामुळे  संपूर्ण कुटुंबाचे  पोषण व्हावे, त्यांची रोगप्रतिकारशक्ति वाढावी यासाठी या योजनेद्वारे  मोफत डाळ व खाद्य तेल  देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार येथील आदिवासी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विवेक पंडित यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमंत सावरा तसेच इतर अधिकारी व मान्यवरांसह आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित  होते.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना