शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

लेटलतिफ डॉक्टरांमुळे कंपाउंडर करतात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:55 AM

मीरा- भाईंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उशिराने येणाऱ्या डॉक्टरांमुळे चक्क कंपाउंडरच आलेल्या रूग्णांची तपासणी करून औषधं देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उशिराने येणाऱ्या डॉक्टरांमुळे चक्क कंपाउंडरच आलेल्या रूग्णांची तपासणी करून औषधं देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेचे नियंत्रण व देखरेख नसल्याने अन्य काही आरोग्य केंद्रांमध्येही डॉक्टर वेळेत न येणे, औषधांचा तुटवडा आदी अनेक तक्रारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या भाविक पाटील या तरूणाला पालिकेच्या भोंगळ कारभाराचा अनुभव आला. मंगळवारी सकाळी ९ वाजता गेलेल्या भाविकला डॉक्टरच विलंबाने आल्याने एक तास थांबावे लागले. ९ ची वेळ असताना १० वाजता डॉक्टर आल्या. त्या आधी डॉक्टर नसल्याने कंपाऊंडरच रूग्णांना औषधं देत होता. त्यातही मलेरिया, मधुमेहाचे रूग्ण औषधं नसल्याने परत गेले.सेव्हन इलेव्हन रूग्णालयाच्या इमारतीत महापालिकेच्या मालकीची जागा आधीच अनेक वर्षानंतर विकसकाने पालिकेला हस्तांतरीत केली. त्यासाठी थेट लोकायुक्तांपर्यंत तक्रारी झाल्या व आंदोलने केली गेली. त्यानंतर पालिका व सत्ताधाऱ्यांनी रडतकढत हा दवाखाना सुरू केला. परंतु त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाच दुसरीकडे प्रशासनाचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. या दवाखान्यात डॉक्टर उशिराने येतात अशी तक्रार आधीपासूनच होत होती. विशेष म्हणजे महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यालया लागूनच हे आरोग्य केंद्र आहे.पेणकरपाडा येथील पालिका आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. तर पालिकेच्या एकूणच आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर - कर्मचारी विलंबाने येणे, कंपाउंडरकडून औषधे देणे, आवश्यक औषधे नसणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत. होणाºया गैरसोयींमुळे उपचारासाठी येणारे नागरिक त्रासले आहेत. तर प्रशासनाचे आरोग्य केंद्रावर नियंत्रण व लक्ष नसल्याने एकूणच कारभार रामभरोसे चालला आहे.।डॉक्टर वा कर्मचारी आरोग्य केंद्रांमध्ये विलंबाने येत असल्याच्या तक्रारी आल्या असून सर्वच आरोग्य केंद्रांना लेखी सूचना देणार आहे. कंपाउंडर हा रुग्ण तपासत नाही तर आधी आलेल्या रुग्णांनी औषधं मागितली तर ती दिली जातात. - डॉ. प्रमोद पडवळ,प्रमुख वैद्यकीय अधिकारी>लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना स्वत:ची दालने आणि फायद्याची काळजी बरोबर असते. पण नागरिकांच्या आरोग्याशी काही सोयरसूतक नसते. आरोग्य केंद्रात हे डॉक्टर - कर्मचारी उशिरा येणे, औषधं नसणे, अत्यावश्यक सुविधा - साहित्य न देणे हे नेहमीचेच झाले आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे.- निलेश साहू, स्थानिक नागरिक