शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार- कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: March 3, 2023 19:59 IST

'हिरकणीचा वारसदार असलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायात उतरून प्रगती करावी.'

भिवंडीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून भिवंडी तालुक्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कायमस्वरुपी रोजगार मिळवून देण्यासाठी उत्तम प्रकल्प उभारण्याचा विचार केला जात आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी दाभाड येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली.

हिरकणीचा वारसदार असलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायात उतरून प्रगती करावी असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,सिद्धेश पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष पी.के.म्हात्रे,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रेया गायकर, माजी पंचायत समिती सभापती रवीना जाधव,श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर,अशोक सापटे आदींची उपस्थिती होती. 

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात दूध व भाजीपाल्याला मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील २२ टक्के लोकसंख्या याच पट्ट्यात राहत आहे. त्यादृष्टीकोनातून भाजीपाला व डेअरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी काळात भिवंडीतील महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी कायमस्वरुपी उभारण्याचा प्रयत्न आहे. महिलांनी मेहनत केल्यास त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या वेळी महंत स्वामी चिंतानंद सरस्वती यांना ठाणे जिल्हा महंत भूषण, भगवान बाबुराव भोईर यांना ठाणे जिल्हा भजन भूषण पुरस्कार, सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व सुदाम हजारे, न्यायाधीश पदावर उत्तीर्ण रुणाली रंजना दयानंद पवार यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये एका आदिवासी भगिनीला स्कूटीचे बक्षीस मिळाले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडीNarendra Modiनरेंद्र मोदी