शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातून हद्दपार झालेल्या जीन्स वॉश कारखान्याचा ग्रामीण भागात सुळसुळाट, नद्या प्रदूषणाच्या विळख्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 18:50 IST

शहरातून सन २०१७ मध्ये हद्दपार झालेल्या जीन्स वॉश कारखान्याचा ग्रामीण परिसरात सुळसुळाट झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी केला.

उल्हासनगर : शहरातून सन २०१७ मध्ये हद्दपार झालेल्या जीन्स वॉश कारखान्याचा ग्रामीण परिसरात सुळसुळाट झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी केला. या कारखान्यामुळे नद्याच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

उल्हासनगरातील कॅम्प नं-४ व ५ परिसरात शेकडो जीन्स वॉश कारखान्यांमुळे वालधुनी नदीचे प्रदूषण व जलस्त्रोत धोक्यात आल्याची ओरड झाली. महापालिका व प्रदूषण मंडळाने, शेकडो जिश वॉश कारखान्यावर कारवाई करून कारखाने सील केले. कारखाने बंद झाली, मात्र वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे. या जीन्स वॉश कारखान्यानी ग्रामीण परिसरात स्थानिक नेते, अधिकारी यांना हाताशी धरून कारखाने सुरू केले. वालधुनीनंतर आता उल्हास, मुकी, गवर आणि कासाडी या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उल्हासनगर कॅम्प ५, चिखलोली, वसार, मानेरे, आशेले, चिंचपाडा, द्वारली पाडा, अंबरनाथ फार्मिंग सोसायटी आणि पाईपलाईन या परिसरात शेकडो जीन्स वॉश कारखाने राजरोसपणे सुरू झाल्याचा आरोप दायमा यांनी केला.

बोअरवेलच्या पाण्याला उग्र वास 

या जीन्स वॉश कारखान्यांमधून निघणारे ऍसिडयुक्त रासायनिक सांडपाणी पाणी थेट जमिनीखाली किंवा जवळच्या नद्यांमध्ये सोडले जात आहे. यामुळे या भागातील बोरवेलच्या पाण्याला उग्र वास येत असून पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे.

प्रदूषण मंडळाच्या नोटिसींना केरांची टोपली 

प्रदूषण मंडळाकडे अश्या वॉश कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहेत. मात्र जमीन मालकांनी या नोटिशीला केरांची टोपली दाखविली आहे. या कारखान्यावर लाखोचे वीज बिल थकलेले असतानाही कारवाई नाही.

जमिनीच्या पोटाला 'केमिकल'चा विळखा

पाण्यासाठी या परिसरात शेकडो अनधिकृत बोरवेल खोदण्यात आले आहेत. अत्यंत घातक रासायनिक पाणी प्रक्रिया न करताच जमिनीत खड्डा करून साठवले जात आहे. यामुळे जमिनीतील पाणी साठा कायमचा विषारी होण्याची भीती निर्माण झाली असून, याचा थेट फटका शेतीला आणि मानवी आरोग्याला बसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jeans wash factories reappear in rural areas, polluting rivers.

Web Summary : Jeans wash factories, banned in Ulhasnagar, are now polluting rural rivers. Untreated chemical waste contaminates borewell water and threatens agriculture and human health. Authorities' notices are ignored.
टॅग्स :Ulhas Pawarउल्हास पवारcivic issueनागरी समस्या