शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

भिवंडी शहरात सुधारणा, ग्रामीणमध्ये चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 1:04 AM

प्रशासनाकडून उपाययोजना। रुग्णवाढ दुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आले आहे. भिवंडीतील रुग्णवाढदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर आला आहे. मात्र, ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने तेथे परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने जुलैमध्ये भिवंडी पालिकेच्या आयुक्तपदी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली. त्यांनी राबवलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलैच्या अखेरीस दिसून आला.

आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयांत बेड रिकामे होत आहेत. त्याचबरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.तर, ग्रामीण भागातील रुग्णांना सुरुवातीपासून रुग्णालयात दाखल होण्यापासून उपचार मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात यशस्वी न झाल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारलेलीनाही.येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात ३०० बेडचे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे २०० तर काल्हेर येथे १०० बेडसह सवाद येथे ७०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हीच कोविड सेंटर आधीपासूनच सुरू केली असती, तर ही परिस्थिती आली नसती. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने तेथील रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.शहरात मृत्युदर ५.४४ टक्केदरम्यान, शहरातील रुग्णवाढीचा वेग मंदावला असून रुग्णदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर पोहोचला, तर शहरातील मृत्युदर ५.४४ टक्के तर ग्रामीण भागात मृत्युदर ३.१२ टक्के आहे. दरम्यान, ‘जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची संख्या जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या संख्येत वाढ दिसत आहे. मात्र, जुलैपासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्युदर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या