शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून १४ महिने सायकलवरून प्रवास करणाऱ्या गंधारने उलगडला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 4:17 PM

विविध राज्यांतील भाषा आणि तेथील खाद्यसंक्ृतीबद्दल गंधार कुळकर्णीने रोमांचक माहिती कट्टेकऱ्यांना दिली.

ठळक मुद्दे१४ महिने सायकलवरून प्रवास करणाऱ्या गंधारने उलगडला प्रवासमातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सायकलवरून प्रवास३३ राज्य गंधारने सायकलवरुन काढले पिंजून

ठाणे : मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून चौदा महिने सायकलवरून १९८५० किमी पिंजून काढणाºया गंधार कुळकर्णी या तरुणाने आपला प्रवास दृकश्राव्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला. सायकल आणि मी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना गंधारने जपानमध्ये जशी जपान भाषा वेगळी केली तशा आपण आपल्या भाषा वेगळ््या केल्या का असा सवाल उपस्थित केला. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने गंधारने आपला सायकलवरचा रोमहर्षक थरारक प्रवास अत्रे कट्ट्यावरील प्रेक्षकांसमोर उलगडला.

               ३३ राज्य गंधारने सायकलवरुन पिंजून काढले. विविध राज्यांतील भाषांचे वैशिष्ट्य सांगताना गंधारने तेथील खाद्यसंस्कृतीही उलगडली. भारतातील भाषा पाश्चात्यांनी चार कुळांत विभागल्या. भारतीयांनी आपापल्या भाषेतील साम्य पाहण्याचा प्रयत्न केला आहे का? हे विविध राज्यांत फिरल्यावर दिसते. लिपी आणि भाषा या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. पण कोणतीही भाषा कोणत्याही एका लिपीत लिहू शकत नाही. हिंदी लिपी नसून ती भाषा आहे. देवनगरी ही लिपी आहे. आपल्याच भाषांच्या परस्परांमधील साम्य आपण जाणून घेतले पाहिजे असेही गंधारने सांगितले. चोरावर मोर आपण म्हणतो पण मल्याळममध्ये चोर म्हणजे भात आणि मोर म्हणजे ताक त्यामुळे भातावर ताक असा अर्थ होतो. प्रत्येक राज्यात संस्कृतमधील शिक्षण वेगवेगळ््या प्रकारे पाहायला मिळते. संस्कृतमध्ये काय शिकायचे असा प्रश्न विद्यार्थ्याला जेव्हा पडतो तेव्हा त्या अभ्यासाचा भविष्यात काहीही फायदा होत नाही. छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर देवरी गाव असून तेथील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी शाळेतील अभ्यासिकेचे दोन तास आधीच निघावे लागते. याचे कारण तेथील शिक्षकांना विचारले तेव्हा त्यांनी या बस नंतर खूप वेळाने विद्यार्थ्यांनी एसटी मिळते. एसटीसाठी विद्यार्थ्यांना तासन तास प्रतिक्षा करावी लागत असल्याचा अनुभव कथन केला. कोकणी भाषा, गोवा प्रांत आणि महाराष्ट्र राज्य यांचे चांगले संबंध दिसून येतात. परंतू राजकीय शक्तीमुळे कोकणी आणि मराठी भाषेत दरी निर्माण केली जाते. आपण कोकणी भाषा म्हणून स्वीकारली, गोवा राज्य म्हणून स्वीकरले. असे असताना कोकणी मराठी भाषेतून निर्माण झाली असे आपण म्हणतो तेव्हा गोव्यातील लोक दु:खी होतात. त्यामुळे कोकणी ही आपली बहिण म्हणून स्वीकारावे असे मत मांडताना गंधार पुढे म्हणाला की, भाषांना समांतर स्थान दिले तर परस्परांमधला भेद दूर होईल. कोकणी भाषेला वेगळे अस्तित्व आहे हे मानून पुढे गेलो तर एकात्मता दिसेल. शेवटी प्रश्नोत्तराचा तास रंगला.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक