शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या पाण्याला पाठपुराव्याचा खोडा

By admin | Updated: February 22, 2016 00:38 IST

महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी बनविलेली स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून लाल फितीत अडकली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा

भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी बनविलेली स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून लाल फितीत अडकली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्याचे सूत्राकडून समजते. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.महानगरपालिका क्षेत्रात विकास होत असताना वाढत्या लोकसंख्येसाठी नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेस भातसा धरणातून १०० एमएलडी पाणी मंजूर झाले असून ते पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनपाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बनविली असून ती सध्या शासनाकडे प्रलंबित आहे. सध्या मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी मुंबई मनपाकडून ४० एमएलडी, स्टेमकडून ७३ एमएलडी व वऱ्हाळा तलावामधून २ एमएलडी असे एकूण ११५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार भविष्यात लागणाऱ्या पाण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन मनपाने खाजगी सहकारी भागीदारी तत्त्वावर १०० एमएलडी पाण्याची योजना केली आहे. भातसा धरणातून पिसे येथील बंधाऱ्यातून १०० एमएलडी पाणी घेऊन ते कार्यान्वित करणे व वारणा नाल्यावर खडकीखुर्द येथे मध्यम आकाराचे धरण बांधणे, अशी योजना आहे. तसेच शहराच्या आजूबाजूच्या नदी-खोऱ्याचे सर्वेक्षण करून नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करून ५७१.११ कोटींचा प्रकल्प अहवाल महासभेपुढे ठेवला होता. तेव्हा विशेष हेतू यंत्रणेमार्फत हा प्रकल्प राबविण्यासाठी मंजुरी दिली. मनपाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम मे.एस.पी.एम.एल. इन्फ्रा लि. यांना वारणा व भातसा पिसे धरण बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर कार्यान्वित करण्याची मान्यता महासभेने नोव्हेंबर २००७ मध्ये दिली. या ठरावानुसार डिसेंबर २००९ मध्ये करारनामा करण्यात आला. हा प्रकल्प राबविण्यासाठी विलंब होणार असल्याने वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेला १०० एमएलडी पाणीपुरवठा तातडीने भातसा धरणातून मंजूर करण्यासाठी मनपाव्दारे मार्च २०१२ मध्ये शासनास पत्र पाठविले. शासनस्तरावर अनुकूल निर्णय होऊन १०० एमएलडी पाणी मंजूर करण्यात आले. या शासन निर्णयाप्रमाणे मूळ प्रकल्पांचा समावेश असलेला फेर विस्तृत प्रकल्प अहवाल मनपाव्दारे तयार करून ५६८ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.स्वतंत्र योजनेनंतरच पाणीप्रश्न निकाली निघणारया प्रकल्पासाठी लागणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या मंजुऱ्या तत्कालीन आयुक्तांनी प्राप्त करून घेतल्या आहेत.मनपा महासभा ठरावाच्या व शासनाकडून मंजूर सवलत करारनाम्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेस भातसा धरणातील १०० एमएलडी प्रतिदिन पाणीपुरवठा पिसे येथून उपसा करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे कार्य विशेष हेतू यंत्रणेमार्फत राबविण्यासाठी मान्यता देऊन मंजुरी मिळावी, अशा मागणीचे पत्र तत्कालीन आयुक्त जीवन सोनावणे यांनी आॅक्टोबर २०१३ साली राज्याच्या प्रधान सचिवांना पाठविले आहे. शहरात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांचे मोर्चे पालिकेत येत असताना विद्यमान आयुक्त व लोकप्रतिनीधींनी या प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तर स्वतंत्र पाणीयोजना निर्माण होऊन पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.