शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये चोर सोडून संन्याशालाच फाशी

By admin | Updated: June 13, 2017 03:21 IST

शहरातील बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या प्रामाणिक

- लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : शहरातील बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकाला पोलिसांच्या दबंगगिरीचाच सामना करावा लागला. वाहतूक पोलीस शिवाजी चौकात कार्यरत असतानाही रिक्षाचालक बेशिस्तपणा करत असल्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न या रिक्षाचालकाने केला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी त्याला थेट पोलीस ठाण्यात नेले. अंबरनाथमधील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत असून शहरातील प्रमुख चौकांत होणाऱ्या कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौक सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी रिक्षाचालक चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. रेल्वे स्थानकजवळ असल्याने शिवाजी चौकातून प्रवासी मोठ्या प्रमाणावर येजा करत असतात. येथील चौकात बेशिस्त रिक्षाचालकांनी काही वर्षांपासून बेकायदा थांबे उभारून त्यातून प्रवासी बसवण्यास सुरुवात केली होती. त्यात, रात्रीच्यावेळी हेच रिक्षाचालक चौकात प्रवासी उतरवून इतर प्रवासी भरण्यासाठी उभे राहतात. त्यामुळे पादचारी आणि इतर नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर, कारवाई करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून एक रिक्षाचालक आशीष देशपांडे करत आहेत. यावर काही ठोस होत नसताना याविरुद्ध प्रामाणिक रिक्षाचालकाने लढा उभारला आहे. बेशिस्त रिक्षाचालक, स्क्र ॅप रिक्षाचालक अशाविरुद्ध दोन वर्षांपासून वाहतूक पोलीस, रस्ते वाहतूक विभाग आणि पोलीस विभागाच्या कार्यालयात जाऊन न्याय मागणारे देशपांडे यांनी या बेशिस्त रिक्षाचालकांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतानाही रिक्षाचालक आपला मुजोरपणा कायम ठेवत असल्याचे हे चित्रीकरण होते. या चित्रीकरणानंतर वाहतूक पोलीस या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करेल, असे वाटत असताना या वाहतूक पोलिसांनी उलट देशपांडे यांनाच दमदाटी केली. यावेळी कोंडीच्या ठिकाणी न जाता चौकात उभ्या असलेल्या एका वाहतूक पोलिसाने देशपांडे यांना रागाच्या भरात रिक्षात कोंबले. देशपांडे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. मात्र, स्थानिक पोलिसांना देशपांडेंच्या हेतूबद्दल संशय नसल्याने त्यांनी देशपांडे यांना कोणतीही चौकशी न करता सोडले. याप्रकरणी अंबरनाथ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धाटावकर यांना विचारले असता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बाजू सावरत रिक्षाचालक हा चित्रीकरण करून कामात अडथळा निर्माण करत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेले होते, असे स्पष्ट केले. देशपांडे हे बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात असल्याची कल्पना शिवाजीनगर पोलिसांना असल्याने त्यांनी देशपांडे यांना चौकशी न करता सोडून दिले. मात्र, बेशिस्त रिक्षाचालकांना संरक्षण देणाऱ्या संबंधित वाहतूक पोलिसावर कारवाईची मागणी होत आहे.