शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रवी पुजारी टोळीतील आठ जणांना अटक

By admin | Updated: October 31, 2015 00:01 IST

उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि पाच काडतुसे हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.प्रवीण पाटील (२५), प्रशांत सपकाळ (२९), रा. दोघेही रा. कुची, जि. सांगली, मिर्चू शर्मा (४६), रा. उल्हासनगर, शफिक शेख (३७), नामदेव आढाव (४०) रा. दोघेही अंबरनाथ तसेच नितीन आघडे, कैलास प्रधान आणि सचिन लोंढे अशी अटक केलेल्या आठ जणांची नावे आहेत. रवी याने त्याच्या टोळीतील सहकारी सुरेश पुजारी याला ठाणे, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिसरातील राजकीय व्यक्ती आणि बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन करण्यासाठी सांगितले होते. त्यावरून सुरेशने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या भागातील बांधकाम व्यावसायिक सच्चानंद कारिरा याच्याकडे त्याने खंडणीची मागणी केली होती. त्यांनी ती न दिल्याने त्याच्या टोळीतील साथीदारांच्या मदतीने ११ सप्टेंबर २०१५ रोजी कारिरा यांची त्यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयात गोळ्या घालून हत्या केली. या खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आणि शार्पशूटर नितीन औघडेला पोलिसांनी तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर, रवी आणि सुरेश पुजारी टोळीतील गुन्हेगारांची ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने राज्यात आणि राज्याबाहेर तपास करून या खुनाशी तसेच खंडणीच्या गुन्ह्यांशी संबंधित टोळीला २२ ते ३० आॅक्टोबरदरम्यान अटक केली. त्यांच्यापैकी शफिक याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि दोन काडतुसे तसेच नामदेव याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि चार काडतुसे जप्त केली.