शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
4
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
5
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
6
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
7
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
8
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
9
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
10
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
11
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
12
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
13
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
14
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
15
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
16
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
17
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
18
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
19
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
20
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वीज खंडित, प्राथमिक आरोग्य केंद्रे अंधारात

By admin | Updated: March 6, 2016 01:40 IST

या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे.

हुसेन मेमन,  जव्हार
या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे.
जव्हार तालुक्यात साकुर, साखरशेत, जामसर, नांदगाव, या चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या चारही आरोग्य केंद्रांचे वीजबील गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून थकले आहे. महावितरणने प्राथमिक आरोग्य
केंद्राना गेल्या महिन्यांपासून वारंवार सूचना लेखी निवेदने देऊनही ते भरण्यात न आल्याने ही कारवाई महावितरणने केली. त्यामुळे ही केंद्रे फक्त दिवसाच रुग्णसेवा देऊ शकत आहेत.
अगदी तातडीच्या परिस्थितीत मेणबत्ती अथवा चिमणीच्या प्रकाशात किंवा इमर्जन्सी व लॅम्पच्या प्रकाशात कसेबसे उपचार केले जातात. या केंद्रात रात्री-बेरात्री उपचारासाठी रोज शेकडो रुग्ण येतात. मात्र दोन दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने रुग्णांवर अंधारात उपचार केले जात आहेत. या केंद्रांचे ७ ते ८ महिन्यांपासून ३ लाख ५० हजाराचे लाईट बिल थकलेले आहे. आरोग्य केंद्रांना विद्युत लाईट नसल्याने, शीतगृहात व फ्रीजमध्ये टी.टी.चे इंजेक्शन, पोलिओ, लस, रक्त पिशवी,
औषधे, इंजेक्शन फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. परंतु आता फ्रीजही बंद आहे.
प्रशासनाने विजेची बिले भरून या आरोग्य केंद्राचा पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य- रतन बुधर, व जव्हार पंचायत समिती सदस्य- सुधाकर वळे, व मनोज गावंढा यांनी केली आहे. अन्याथा जव्हार एमएसीबीवर आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
पावसामुळे झाडे उन्मळलीजव्हार : या शहरात गुरूवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपले, मुकणे आळीतील सदू मुकणे व अरूण सहाने याच्या दुकानावर व परिसरातील मोटरसायकलींवर भले मोठे आंब्याचे झाड उन्मळून पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरात काही ठिकाणी मोठ मोठी झाडे पडली. परंतु आसपास घरे अगर इतर कोणीही नसल्यामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही. जव्हार नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख अखलाक कोतवाल आणि त्यांचे सहकारी यांनी तातडीने मनुष्यबळ वापरून झाडांच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला आहे.
जव्हार मधील जुनी डॅम आळी येथील रहिवाशांच्या काही घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे, तर काही तुंबलेल्या गटारीत आलेले पावसाचे पाणी नासीर मेमन यांच्या घरात घुसून सर्वत्र दुर्गधी पसरली होती, त्यामुळे काही घरातील मंडळींना घर धुवून काढावे लागले, तसेच जव्हार तालुक्यातील खेडोपाड्यातही काजू व आंब्यांच्या बागांचे मोहोर गळल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे.
त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेले आहे, गेल्या दोन तीन वर्षापासून फेब्रुवारी व मार्र्च महिन्यात अचानक अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात आंबा व काजूची आवक कमी होत चालली आहे, मेहनत करून फळ मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे नुकासान सहन करण्याखेरीज दुसरे काहीच करता येत नाही, आणि शासनाच्या तटपुंज्या भरपाईमुळे झालेले नुकसान भरून निघत नाही असे शेतकऱ्यांनी बोलतांना सांगितले. (वार्ताहर)