शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

आवाहन करूनही कुरव पक्ष्यांना टाकले जातेय कृत्रिम पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST

ठाणे : कुरव पक्ष्यांना कृत्रिम खाद्य खायला घालणे हे त्यांच्यासाठी अत्यंत घातक आहे. याविषयी रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ...

ठाणे : कुरव पक्ष्यांना कृत्रिम खाद्य खायला घालणे हे त्यांच्यासाठी अत्यंत घातक आहे. याविषयी रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ठाणेकरांमध्ये जनजागृती करून असे खाद्यपदार्थ न टाकण्याचे आवाहनदेखील केले. परंतु, तरीही दुसऱ्या दिवशीपासून कुरव पक्ष्यांना कृत्रिम पदार्थ खायला टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशांवर दंडात्मक कारवाईची मागणी पर्यावरण संस्थांनी केली आहे.

पक्ष्यांचे खायला घालणे हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. आपल्या अशा अनावश्यक कृतीमुळे कुरव पक्ष्यांच्या स्थलांतरावर व राहण्या-खाण्याच्या सवयींवर विपरीत दूरगामी परिणाम संभवतो, याची नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे नागरिकांच्या माहितीसाठी रविवारी सकाळी मासुंदा तलाव येथे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या सहभागी संस्था व मराठा जागृती मंच, ठाणे यांच्यातर्फे जनजागृती करण्यात आली.

पुण्यकर्माच्या अंधश्रद्धेतून स्थलांतरित पक्ष्यांना खाद्य घालण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. पर्यावरणीय संस्था लोकशिक्षणाच्या माध्यमातून जनजागरणाचे काम करीत आहेत. तलाव व आसपासच्या परिसरात प्रदूषण करणे रोगराईला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे वनविभाग व ठामपा यांनी संयुक्तरित्या पक्ष्यांना खाद्य टाकणे कसे चुकीचे आहे, याची माहिती देणारे प्रबोधनपरफलक ठाणे शहरात मोक्याच्या जागांवर लावावे तसेच मासुंदा तलाव येथे सीसीटीव्ही लावून कायदेभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तरच या गैरप्रकारांवर संपूर्णतः आळा बसू शकेल, असे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे समन्वयक रोहित जोशी यांनी सांगितले.

जनजागरण मोहिमेदरम्यान पक्ष्यांना खाद्य टाकण्यास आमच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना मज्जाव केल्यास त्यांच्याबरोबर खटके उडण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. स्वयंसेवी संस्था म्हणून आमच्या मर्यादा आहेत. पक्ष्यांना व त्यांच्या अधिवासाला जाणीवपूर्वक धोका पोहोचविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली तरच अशा चुकीच्या गोष्टींना पायबंद बसेल. तरी कारवाईची जबाबदारी असलेल्या ठामपा व वनविभाग या प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे मराठा जागृती मंच, पानिपत, ठाणे विभागाचे सुधाकर पतंगराव म्हणाले.

-------------

फोटो मेलवर

-