शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

जो तालुका मुंबईला पाणी देतो, त्याची तहान कधी भागवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:09 IST

रणरणत्या उन्हात तप्त जमिनीवरून जंगलातील चढ-उताराच्या पायवाटेने महिला-भगिनींना घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे

प्रकाश परांजपे 
ज्येष्ठ पत्रकार

गेल्या वर्षी धुवांधार पावसाने सहा महिने या मुक्काम ठोकूनही शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागात यंदा लवकरच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. बोअरवेल, विहिरी यांसारखे जलस्रोत आटल्याने रणरणत्या उन्हात तप्त जमिनीवरून जंगलातील चढ-उताराच्या पायवाटेने महिला-भगिनींना घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, आजमितीस ५१ गावपाड्यांवर १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

अडथळ्यांच्या शर्यतीत असलेली साडेतीनशे कोटींची भावली पाणी योजना व निधीअभावी जलजीवन मिशनची पाणी योजना रखडल्याने शासनाची 'हर घर नल से जल' ही घोषणा हवेतच विरली आहे. "जो तालुका मुंबईची तहान भागवतो, त्या शहापूरची तहान कधी भागणार?", हा प्रश्न मात्र कायम आहे. एकीकडे मुंबई महानगराला अखंड पाणीपुरवठा करणारे भातसा, तानसा आणि मोडकसागर ही मोठी धरणे शहापूर तालुक्यात असताना, "धरण उशाला आणि कोरड घशाला", अशी अवस्था आहे. त्यामुळे दुर्गम गावपाड्यांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते.

 बोअरवेल, विहिरी, पाणी योजनांची दुरुस्ती आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा टंचाई आराखडा तयार करावा लागतो. मात्र, पाणीटंचाईमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. यावर्षी देखील तब्बल तेरा कोटींचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला असून, गतवर्षानुसार साधारणपणे तालुक्यातील किमान पावणेदोनशे गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, दरवर्षी टँकरची संख्या व खर्चात सातत्याने चढ-उतार दिसतो. मात्र समस्या कायम आहे. २०२०-२१ ते २५-२६ या कालावधीत टँकरसाठी १७ कोटी खर्च झाला आहे.

धरण उशाला, कोरड घशाला... 

"आमच्याकडे शेती आहे, जनावरं आहेत; पण पाणी नाही. टैंकरचं पाणी पिण्यासाठीच पुरतं, जनावरांना पाणी देणंही कठीण झालंय..." पोटासाठी मोलमजुरीकडे पाठ फिरवून रणरणत्या उन्हात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, असे उठावा येथील शेतकरी सखाराम वारे यांनी सांगितले. तर, दुसरे शेतकरी म्हणाले, "धरणं आमच्या डोळ्यासमोर आहेत, पण आमच्या शेताला पाणी मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : When will the thirst of Shahapur, Mumbai's water provider, be quenched?

Web Summary : Despite hosting dams supplying Mumbai, Shahapur faces severe water scarcity. Villagers rely on tankers as water schemes stall. Thirteen crore sanctioned for relief, but the problem persists, highlighting the irony of 'water at the head, dryness at the throat'.
टॅग्स :Waterपाणीshahapurशहापूरthaneठाणे