शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

दोन वर्षात अमृत योजना कार्यन्वित होणार; महापालिका अधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 8:35 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची  टंचाई निर्माण झाली आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची  टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे २७ गावांसाठी १९४ कोटी रुपयांचा निधी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. त्यासाठी पाण्याच्या उभारण्यासाठी लागणाऱ्या जागा आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रमोद पाटील यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांसमवेत गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा शनिवारी घेतला.

त्या योजनेंतर्गत गावांमध्ये तब्बल २८ पाण्याच्या टाक्या आणि १४ सब टाक्या उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या जागांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी,खाजगी विकासक, जागामालक यांचा आमदार पाटील यांनी समन्वय घालण्याचे आश्वासन।दिले. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी  इतर समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाला योग्यते सहकार्य केले जाईल असे सांगितले आहे. तर खाजगी विकासक,जागामालकांनी देखील योग्य सहकार्य केडीएमसी अधिकाऱ्यांना केले जाईल असे पाटील यांना सांगितले.

   कल्याण ग्रामीण मधील आजदे, सोनारपाडा,डोंबिवली एमआयडीसी, भोपर-देसलेपाडा, उसरघर, कोळे आणि कटाई या गावांमध्ये जागेची पाहणी करत  योजनेचा आढावा घेतला आहे.तर उर्वरीत गावांमध्ये पाहणी दौरा देखील लवकरच केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.

 येत्या दोन वर्षात २७ गावांमध्ये ही योजना कार्यन्वित होणार असून कल्याण डोंबिवली मधील २७ गावांना या योजनेअंतर्गत १०५ एमएलडी पाणी मिळणार आहे.त्यामुळे २७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.असे केडीएमसीचे अधिकारी राजू पाठक आणि विजय पाटील यांनी सांगितले आहे. जोपर्यंत ही योजना पूर्णपणे कार्यन्वित होत नाही तो पर्यंत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करता येईल का ? याचा सुद्धा आढावा घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. या आढावा दौऱ्यावेळी पाटील यांच्यासह केडीएमसीचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  राजीव पाठक, विजय पाटील,मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, मनसे नगरसेवक प्रभाकर जाधव, केडीएमटी सद्यस प्रसाद माळी, मनसे उपविभाग अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका