शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

स्मार्ट सिटीतील ४२ प्रकल्प संशयाच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:43 AM

ठाणे स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात ४२ प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, त्यातील अर्बन रेस्टरूम, सुशोभीकरण किरकोळ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

ठाणे : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ४२ प्रकल्पांतील बहुसंख्य कामे अपूर्ण अवस्थेत असून त्यार खर्च केलेला कोट्यवधींचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या संशयास्पद कामांची चौकशी करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे.

ठाणे स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात ४२ प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, त्यातील अर्बन रेस्टरूम, सुशोभीकरण किरकोळ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर, ४६ कोटींचे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर प्रकल्पाचे काम ९८ टक्के पूर्ण आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा ठाणेकरांना किती फायदा झाला, हे उघड आहे. कोट्यवधींच्या कॅमेऱ्यांचा पोलिसांना उपयोग होत नाही. ११ रेस्ट रूमचे काम पूर्ण झाल्याबद्दल कंपनीचे अधिकारी पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.गेल्या पाच वर्षांत स्मार्ट सिटीला केंद्र सरकारने १९६ कोटी, राज्य सरकारने ९८ कोटी निधी प्रदान केला. तर, आपल्या हिश्श्यातील २०० कोटी रुपये महापालिकेने देऊन कामांना सुरुवात केली. परंतु, प्रत्यक्षात स्मार्ट सिटीतून अपेक्षित सुविधा मिळालेल्या नाहीत. यामुळे अपेक्षित वेग राखू न शकलेले प्रकल्प रद्द करण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक प्रकल्प लादणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष, महापालिका आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका