शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. पदाधिकारी सभा टाळू लागले!

By admin | Updated: May 30, 2014 00:41 IST

आचारसंहितेचे कारण: पुणे विभागातील अन्य परिषदा घेतात सभा

सोलापूर : एकीकडे प्रशासन सहकार्य करीत नाही, सहकारी पदाधिकारी हेटाळणी करीत असल्याने राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत जि.प. अध्यक्षा आलेल्या असताना दुसरीकडे आचारसंहितेचे कारण पुढे करुन सर्वसाधारण सभा टाळली जात आहे. विशेष म्हणजे पुणे विभागातील अन्य जिल्हा परिषदांच्या सर्वसाधारण सभा मात्र होत आहेत. जिल्हा परिषदेच्या कारभारावर अध्यक्षाच समाधानी नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने कामे होत नाहीत, कोणत्या विभागाचे काम समाधानकारक आहे ते सांगा?, असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांचा आहे. सहकारी पदाधिकार्‍यांच्या कारभारावरही त्यांनी तोफ डागली. याची खंत राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना वाटली नाही. सर्वसामान्यांचे काम जिल्हा परिषदेत होत नसल्याचे व काही सभापतींकडून साहित्य खरेदीसाठी कशा प्रकारे अडवणूक केली जाते, हेही अध्यक्षा डॉ. माळी यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हा परिषदेचे असे चित्र असताना सदस्यांकडून सभागृहात होणार्‍या हल्ल्याला सामोरे जाण्यापेक्षा सर्वसाधारण सभाच घेण्याचे टाळले जात आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा मार्च महिन्यात झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर लागलीच पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळेही सोलापूर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. असे असताना पुणे विभागातील अन्य जिल्हा परिषदांनी मात्र सर्वसाधारण सभा व कामकाज सुरू केले आहे.

-----------------------------------------

पुणे विभागातील सोलापूर वगळता अन्य जिल्हा परिषदांनी आचारसंहिता असली तरी सर्वसाधारण सभा व अन्य सभा घेणे थांबविलेले नाही. सांगली जि.प.ची सर्वसाधारण सभा ९ मे रोजी, पुणे जि.प.ची १३ मे रोजी,कोल्हापूर जि.प.ची २७ मे रोजी झाली असून, सातारा जि.प.ची सर्वसाधारण सभा ११ जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.

---------------------------------

पदाधिकार्‍यांना देणे-घेणे नाही ४लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्षा डॉ. माळी दोन वेळा दालनात आल्या. उपाध्यक्ष एक दिवस तेही काही वेळेसाठी दालनात आले. समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी सभापती एखादा दिवस सोडला तर दालनात आले परंतु बैठका घेतल्या नाहीत. शिक्षण समितीचे सभापतीही एक-दोन वेळा काही वेळेसाठी दालनात बसले. एकत्रित बसून चांगल्या विषयावर चर्चा करावी, शासनाकडे येणार्‍या विषयांचा पाठपुरावा करावा, असे कोणालाही वाटले नाही.

----------------------------

आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत असे सीईओंनी सांगितले. एखाद्या सदस्याने प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर दिल्याने आचारसंहिता भंग होण्याची शक्यता असल्याचे सीईओंनी सांगितल्याने सर्वसाधारण सभा रद्द केली. -डॉ. निशिगंधा माळी अध्यक्षा, जि.प. सोलापूर