शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या जमिनी जप्त करून काय विकास करणार ? आमदार भारत भालके यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:33 IST

पंढरपूर तालुक्यातील शेतकºयांना जर आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर असल्या विकासाला आपला तीव्र विरोध निश्चित असेल, असा इशारा आ. भारत भालके यांनी दिला.

ठळक मुद्देपंढरपूर विकास प्राधिकरणाच्या संदर्भात नागरिकांच्या हरकतींच्या तारखा जिल्हा प्रशासनाकडून नुकत्याच जाहीर झाल्यापंढरपूर शहरातील काही रस्त्यांचे रुंदीकरणदेखील केले जाणार

पंढरपूर : विकासाला आपला कदापि विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली शहरातील सर्वसामान्य नागरिक, तालुक्यातील शेतकºयांना जर आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर असल्या विकासाला आपला तीव्र विरोध निश्चित असेल, असा इशारा आ. भारत भालके यांनी दिला. शहराचा विकास सोडून ग्रामीण भागातील शेतकºयांच्या जमिनी जप्त करून काय विकास साधणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पंढरपुरातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पुढे आ. भारत भालके म्हणाले, प्रथम शहरालगतच्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कामाबाबात जमीन मालकांना नोटिसा न देताच, जागा ताब्यात घेण्यात येत आहे. झाडे तोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामात जमीन जाणाºया मालकांना चौपट भरपाई मिळावी; अन्यथा आंदोलन करणार आहे. शहरात प्राधिकरण, तुकाराम जन्मचतु:शताब्दी आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकासकामे केली जात आहेत. 

जो विकास शहरातील नागरिकांची कवडीमोल दर देऊन घरेदारे उद्ध्वस्त करणार असेल तसेच तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनीचा कोणताही मोबदला न देता वाट लावणारा असेल तर अशा विकासाचा काय उपयोग? पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या संदर्भात नागरिकांच्या हरकतींच्या तारखा जिल्हा प्रशासनाकडून नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.

मुळात प्राधिकरणामध्ये पंढरपूर शहराचा, पालखी तळाचा, पालखी मार्गांचा विकास अपेक्षित आहे. मात्र तालुक्यातील ज्या विविध गावांचा शहरात भरणाºया यात्रांशी काहीही संबंध नाही त्या गावातील जमिनी विकासकामांच्या नावाखाली शेतकºयांकडून काढून घेतल्या जात असतील तर असला विकास काय कामाचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शहरातील काही रस्त्यांचे रुंदीकरणदेखील केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याचा मध्य पकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समान अंतरावर मार्किंग करून त्याप्रमाणे रुंदीकरण अपेक्षित असते. मात्र रुंदीकरण करताना हा अपला, तो परका असा भेदाभेद करीत हेतुपुरस्सर काही विरोधी मंडळींना बाधित करून नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबरोबरच बाधित मालमत्ताधारकांना बाजारभाव अधिक चौपट दर अशा पद्धतीने मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी आ. भालके यांनी केली.

कचराकुंडीखाली हजारो अळ्या- स्वच्छतेच्या नावाखाली प्रत्येक नागरिकाच्या खिशातून पैसे काढले जातात. मात्र शहरातील कचराकुंडीखाली हजारो अळ्या आहेत. विरोधी नगरसेवकांनी व्हिडीओ दाखविला तरी, प्रशासन याबाबत गंभीर नाही. चंद्रभागा नदीपात्रात मैलामिमिश्रित पाणी मिसळत आहे. चंद्रभागेतून वाळूचोरी होत आहे. मात्र प्रशासन नदीपात्रात म्हशींना बंदी घालणे, होड्यांना बंदी करण्यामध्ये गुंतले आहेत.

अधिकाºयांना सुनावले खडे बोलशहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे उपजिल्हा रुग्णालय आणि पालिका प्रशासनातील अधिकाºयांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी विविध शासकीय विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यासाठी संबंधित अधिकाºयांना आपण खडे बोल सुनावल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरBharat Bhakkeभारत भालकेPandharpurपंढरपूर