शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध चोपडी ग्रामपंचायतीसमोर पाण्यासाठी महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST

सांगोला : बिनविरोध झालेल्या चोपडी ग्रामपंचायतीला अवघ्या चार दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गुरुवारी ...

सांगोला : बिनविरोध झालेल्या चोपडी ग्रामपंचायतीला अवघ्या चार दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गुरुवारी संतापलेल्या महिलांसह ग्रामस्थांनी रिकामे हंडे अन् घागरी घेऊन आम्हाला पाणी पाहिजे, बाकी काय कारण सांगू नका असा टाहो फोडत थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी ग्रामसेवकांनी समजूत काढून सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्वासन देताच हे आंदोलन मागे घेतले.

चोपडी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीची निवडणूक चार दिवसांपूर्वीच बिनविरोध झाली. एकीकडे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी गावपुढारी आनंदात असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई जाणवत आहे. संतापलेल्या महिलांसह ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास हातात रिकामे हंडे अन् घागरी घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘आम्हाला पाणी द्या ,बाकी काही सांगू नका’ असा टाहो फोडला.

यावेळी महिलांनी गेल्या वर्षभरात केवळ ८४ दिवस पाणीपुरवठा केल्याचा लेखी पुरावा सादर केला. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बुद्धेहाळ तलावातून लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली असताना पाणी का सोडले जात नाही असा संतप्त सवाल उपस्थित करून वर्षाकाठी पाणीपट्टीची दोन हजार रुपये आकारणी केली जाते. मग अडचण काय आहे ते तर आम्हाला सांगा म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीलाच चांगलेच धारेवर धरले.

---

प्रशासकही फिरकत नसल्याचा आरोप

गावाच्या चहूबाजूंनी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी महिला आबालवृद्धांना वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था गावाकऱ्यांची झाल्याचा संताप आंदोलक महिलांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक असून, ते ग्रामपंचायतीकडे फिरकत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक एम. व्ही. मिसाळ यांनी गावाकडे तत्काळ धाव घेतली. त्यांनी महिला ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. येत्या चार दिवसांत गावाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तूर्तास ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

---

पाणी पुरवठा कर्मचाऱ्यालाही कमी केले

चोपडी गावची लोकसंख्या पाच हजार ५०० आहे. गावाला बुद्धेहाळ तलावातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यालाही कमी केल्यामुळे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चोपडी गावची लोकसंख्या पाच हजार ५०० आहे. गावाला बुद्धेहाळ तलावातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यालाही कमी केल्यामुळे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

--

फोटो - ०७ चोपडी

चोपडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी रिकामे हंडे अन् घागरी घेऊन ठिय्या मारला.