शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आज साक्षरता दिवस; राज्यात अद्यापही एक कोटीहून अधिक निरक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 11:25 IST

निरक्षरतेची वेगवेगळी कारणे असली तरी दारिद्र्य हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

ठळक मुद्देराज्यात पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण ८०.२ टक्केमहिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ६७.५ टक्के२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता ८२.९१ टक्के

समीर इनामदार 

सोलापूर: राज्यातील ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायदा असतानाही महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार १.६३ कोटी लोक निरक्षर आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता ८२.९१ टक्के इतकी आहे. चारपैकी एक बालकामगार निरक्षर आहे.

निरक्षरतेची वेगवेगळी कारणे असली तरी दारिद्र्य हे त्यामागील प्रमुख कारण आहे. माणसाच्या रोजच्या जीवनात त्याला लिहिता-वाचता येणे, विविध घडामोडींचे विश्लेषण करता येणे त्याचप्रमाणे स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे यासाठी साक्षरता महत्त्वाची ठरते. राष्ट्रकुलाच्या युनेस्कोच्या सहस्रक निर्धारित लक्ष्याच्या अनुसार जगात २०३० पर्यंत निरक्षरता नष्ट झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात असले तरी अद्याप त्यावर पूर्णत: मात करता आलेली नाही. 

राज्यात पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण ८०.२ टक्के तर महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ६७.५ टक्के इतके आहे. नागरी भागात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. आदिवासी भागात साक्षरतेचे प्रमाण अद्यापही कमी आहे. राज्य शासन निरक्षरता कमी करण्याचा प्रयत्न करीत असले तरी अद्यापही साक्षरता पूर्णत: कमी होऊ शकलेली नाही. राज्याच्या २०१७-१८ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार ७३१५ ग्रामपंचायतींमधील प्रौढ शिक्षण केंद्रात १४,६३० प्रेरक आणि १३८ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, आॅगस्ट २०१७ पर्यंत १५.८९ लाख नवसाक्षरांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

साक्षरता कमी करण्यासाठी साक्षर भारत योजना राबविण्यात येत आहे. २०१६-१७ मध्ये राज्य शासनाचा प्राथमिक शिक्षणावरील खर्च १९,४८६ कोटी इतका होता. सर्व शिक्षा अभियानावर राज्याने २०१६-१७ मध्ये १९८१.४३ कोटी तर २०१७-१८ मध्ये डिसेंबरपर्यंत १३४३.५८ कोटी इतका खर्च केला आहे. डिसेंबर २०१७-१८ मध्ये राज्यात शिक्षणविषयक जिल्हा माहितीप्रणाली अंतर्गत नोंदविलेल्या प्राथमिक शिक्षण देणाºया शाळांची संख्या १,०६,५२७ इतकी आहे. शाळेची पटसंख्या १५९.१ लाख इतकी आहे तर शिक्षकांची संख्या ३१ लाख इतकी आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यादरम्यानचे हे प्रमाण २९.१ इतके आहे. सन २०१७-१८ मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक २६,८७९ इतक्या संस्था असून, त्यात ६६.४८ लाख पटसंख्या आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये डिसेंबरअखेर ३६.९९ कोटी इतका खर्च झाला आहे.

शाळाबाह्य मुलांचीही राज्यात गणना करण्यात येते. जे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये डिसेंबरपर्यंत ४८,३७९ इतकी मुले शाळाबाह्य होती. मुलींच्या गळतीचे वाढते प्रमाण पाहून त्यांच्यासाठी काही योजनाही आखण्यात आल्या आहेत. 

साक्षरता वाढली

- २००१ च्या तुलनेत (७६.९) २०११ मध्ये साक्षरता ८२.९१ इतकी झाली आहे. विशेषत: स्त्री साक्षरतेचे प्रमाण मागच्या तुलनेत वाढली आहे. पुरुषांच्या साक्षरता दरापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. तफावतही १८.९ वरुन १२.५ पर्यंत आली आहे. ग्रामीण आणि नागरी भागातील साक्षरतेचे प्रमाण ७७ टक्के आणि ८८.७ टक्के इतके आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र