शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अवघी ४४ टक्के पेरणी

By admin | Updated: October 23, 2014 14:38 IST

उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

अरुण बारसकर ■ सोलापूर

 
उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे; मात्र परतीचा पाऊस पडला नसल्याने पेरणी झालेल्या उगवणीवर परिणाम होणार असल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती बागायती बिनभरवशाची झाली आहे. सीना नदीकाठच्या गावातील शेती बागायती करण्यासाठी मोठा खर्च करुनही नदीत बारमाही पाणी नसल्याने पिके अडचणीत येत आहेत. सीनेत कधी तरी पाणी असते. बंधारे असूनही पाण्याअभावी कोरडे असतात. त्यामुळे नदीकाठची शेतीही भरवशाची राहिली नाही. नदीकाठची पाच-सहा गावे वगळली तर अन्य गावे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पावसावर अवलंबून असलेली शेती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अडचणीची ठरणार आहे. पूर्ण पावसाळ्यात तालुक्यात ७५ टक्के पाऊस पडला असला तरी तो सर्वत्र नाही. 
एकाचवेळी धो-धो पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेले अन् महिनाभरात उन्हाळ्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात रब्बी ज्वारीची पेरणी उशिराच सुरू होते. उशिरा सुरु होणार्‍या पेरणीने यावर्षी परतीचा पाऊस न पडल्याने म्हणावा तसा वेग घेतला नाही. अवघ्या ४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. यावर्षी संपूर्ण क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता नाही. संपूर्ण पावसाळ्यात एकाच आठवड्यात काही भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडला. खरीप पेरणीवेळी व नंतर पाऊस न पडल्याने खरीप पिकांना पोषक वातावरण राहिले नाही. परतीचा पाऊस न पडल्याने रब्बी पेरणी व उगवणीवर परिणाम होणार आहे.
- एम. वाय.साठे, तालुका कृषी अधिकारी 
अशी आहे स्थिती.. 
■ रब्बी पेरणी झालेले क्षेत्र- १७२.३१ हेक्टर
■ ज्वारी, मका, सूर्यफुल आदींचा समावेश
■ उत्तर तालुक्याचा सरासरी पाऊस- ५४२ मि.मी.
■ प्रत्यक्षात पडलेला पाऊस- ३८३ मि.मी.
■ मागील वर्षी पडलेला पाऊस- ५२८ मि.मी. पेरणीचे क्षेत्र कमी होतेय 
■ ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर, मूग, मटकी यासारखी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल नाही. कमी पाण्यावर कमी दिवसात चार पैसे मिळतील अशी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. यामुळेच रब्बीचे क्षेत्र कमी होत आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी झाले असले तरी उशिरा गहू व हरभर्‍याची काही क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे.