शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यामुळे पाणी पातळी खालावली भंडीशेगाव परिसर;

By admin | Updated: May 12, 2014 01:08 IST

पिके जळण्याच्या मार्गावर

 

पंढरपूर : भंडीशेगाव (ता. पंढरपूर) परिसरातील वाढत्या उन्हाळ्यामुळे विंधन विहीर, बोअरची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. उन्हाळी हंगामात नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याचे हक्काचे पाणी काही शेतकर्‍यांना न मिळाल्याने भंडीशेगाव परिसरातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. भंडीशेगाव परिसरात गेल्या दोन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाणी पातळी वाढावी, पावसाचे पाणी त्या त्या परिसरात जिरावे यासाठी परिसरातील ओढे, नाले, बंधार्‍यातील गाळ काढण्याची मोहीम सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आली होती. त्यानंतर दुष्काळावर मात होईल, अशी आशा बाळगून असणार्‍या शेतकर्‍यांवर पुन्हा निराशाच आल्याचे चित्र आहे. उन्हाळी हंगामाचे नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याची पाणी पाळी झाली. मात्र दोन्ही विभागाकडून पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन न झाल्याने काही शेतकर्‍यांना पाणी मिळाले, तर काहींना मिळालेच नाही. या नियोजनाचा फटकाही लहानमोठ्या शेतकर्‍यांना बसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणी पातळीही दिवसेंदिवस खालावत आहे. विहीर, बोअर व अन्य पाणी स्त्रोत दिवसेंदिवस कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. दिवसेंदिवस खालावत असलेल्या पाणी पातळीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. यामुळे भंडीशेगाव परिसरात पिण्याच्या पाण्याचीही कृत्रिम टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

--------------------------

शेतकर्‍यांवर पुन्हा संकट ४मागील दोन वर्षांच्या भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. या परिसराला वरदान ठरलेले वीर-देवधर व उजनी धरण १०० टक्के भरले होते. याशिवाय परिसरातील बंधारे, विहिरीही तुडुंब होत्या. त्यामुळे यावर्षी दुष्काळ जाणवणार नाही, या आशेवर या परिसरातील शेतकरी होता. मात्र पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पुन्हा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा संकट ओढवल्याचे चित्र आहे.