शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांमुळे अनुदान ठप्प

By admin | Updated: May 24, 2014 01:29 IST

ठिबक सिंचन अनुदान : कृषी खात्याच्या कारभारामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

सोलापूर: शेतकरी, पुरवठा एजन्सी व कृषी खात्याच्या संगनमताने वारंवार केलेला गैरप्रकार सोलापूर जिल्ह्याच्या अंगलट आला असून, मागील चार वर्षांपासूनचे ठिबक सिंचनचे अनुदान शासनाने थांबविले आहे. २०१०-११ ते १२-१३ या तीन वर्षांचे थकलेले १५ हजार शेतकर्‍यांचे ३७ कोटी ६८ लाख रुपये इतके अनुदान मिळण्याचे अधांतरी असल्याने २०१३-१४ या वर्षांची प्रकरणेच कृषी खात्याने स्वीकारलेली नाहीत. सोलापूर जिल्ह्याला व विशेषत: कृषी खात्याला गैरप्रकाराची परंपरा आहे. मागील काही वर्षांत कृषी खात्याच्या प्रत्येक योजनेत गैरप्रकार उघडकीला आला आहे. ठिबक सिंचन, फलोत्पादन, डाळिंब लागवड व अन्य प्रकारच्या सर्वच योजनेत कृषी खात्याच्या सौजन्याने गैरप्रकार झाला आहे. अनेक प्रकरणांची चौकशी सुरू असून, अनेक प्रकरणे चौकशीविनाच दडपली आहेत. सांगोला, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यातील अनेक प्रकरणे मागील काही वर्षांत उघडकीला आली आहेत. दर दोन वर्षांनी साखळी पद्धतीने केलेला गैरप्रकार उघडकीला येतो. त्यामुळे सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाची सतत चौकशी सुरू असते. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी यांनी चुकीच्या पद्धतीने अनेक प्रकरणे केली होती. याची झळ आता प्रामाणिक शेतकर्‍यांना बसू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ठिबक केलेल्या पात्र शेतकर्‍यांचे अनुदान मागील चार वर्षांपासून रखडले आहे. वारंवार कृषी खात्यात बोगसगिरी उघडकीला येत असल्याने कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही सोलापूर जिल्ह्यासाठी योजना व अनुदान देणे अडचणीचे ठरु लागले आहे.त्यामुळे अनुदान देणेच बंद केलेले बरे यापर्यंत सरकार आले आहे. २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या तीन वर्षांत ठिबक केलेल्या जवळपास १५ हजार शेतकर्‍यांच्या अनुदानाची ३७ कोटी ६८ लाख इतकी रक्कम शासनाकडून आलेली नाही. या मागील वर्षांत ठिबक केलेल्यांची प्रकरणेच कृषी खात्याने स्वीकारणे बंद केले.

--------------------------

पाणी असून दुष्काळ! कृषी खात्याच्या मागणीप्रमाणे दिलेल्या अनुदानाच्या रकमेतून भरीव कामे होण्याऐवजी अनुदान हडप करण्यात येते. यामुळे मागील काही वर्षांत कोट्यवधीचे अनुदान देऊनही शेततळी, नालाबंडिंग, सिमेंट बंधारे व अन्य कामे कागदावरच आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता कमी होत असताना सोलापूर जिल्ह्यात पाणी अडण्याची कृषी खात्याच्या कामाशिवाय उजनी धरणाचे पाणी असूनही दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.