शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मतदानावेळी नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडेच असल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:18 PM

मोहोळ विधानसभा मतदारसंघ : टक्का घटला तरी २० हजारांनी मतदान वाढले

ठळक मुद्देअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झालेया निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला

अशोक कांबळे 

मोहोळ : होणार होणार म्हणून बहुचर्चित विधानसभेची निवडणूक यंदा एकदाची संपलीही.  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळविधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झाले असले तरी सन २०१९ मध्ये मतदानाचा आकडा २० हजाराने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. 

सन २०१४ मध्ये २ लाख ८० हजार ३७७ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ५३६ इतके मतदान झाले होते. त्याची टक्केवारी ६६.८६ इतकी होती. तर नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ६५.६२ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. गत निवडणुकीपेक्षा १ टक्का मतदान जरी कमी दिसत असले तरी २० हजार ४५८ मतदान या निवडणुकीत वाढले आहे.

मतदारसंघात शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. त्यामुळे सकाळच्या पहिल्या दोन तासात मतदारांची गैरसोय झाली, परंतु सकाळी ११ नंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. 

मतदारसंघातील कोळेगाव, कुरुल, सावळेश्वर, खुनेश्वर, अर्जुनसोंड, आष्टी या ६ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, परंतु सहायक निवडणूक अधिकारी जीवन बनसोडे व निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी तातडीने मशीन बदलून मतदान सुरळीत पार पडले. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

निवडणूक  प्रचारात तालुक्याच्या स्थानिक राजकारणातील एकमेकांची गटबाजी, एकमेकांच्या गटबाजीतून मतांची कशी होईल विभागणी, एकमेकांचे पाठिंबे यावरून एकमेकांची उणीदुणी काढण्यातच सर्वांनी धन्यता मानल्याचे चित्र प्रचारात दिसून आले. या निवडणूक प्रचारात नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असे चित्र निर्माण झाल्याने सुज्ञ मतदार व नवीन वाढलेल्या युवा मतदारांनी नेमका काय निर्णय घेतलाय हे २४ तारखेला मतमोजणीनंतरच समजणार आहे.

ठोस मुद्यांची वानवा- मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत वंचित राहिल्याचे दिसत आहे.आजही  ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आष्टी उपसा सिंचन योजना, पोखरापूर तलावात पाणी सोडणे, शिरापूर उपसा सिंचन योजना, ५० वर्षांपासून रखडलेला मोहोळ शहराच्या कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, याबाबतचा ठोस अजेंडा घेऊन कोणीच प्रचारात उतरलेले दिसून आले नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोळvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण