शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींचे नुकसान ; त्वरित पंचनामे सुरू बागा भुईसपाट

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

खंडाळी, पापरी परिसरात वादळी वारा-गारपिटीचा फटका

मोहोळ : २७ मे रोजी दुपारी चार वाजता अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह गारपिटीत मोहोळ तालुक्यातील खंडाळी, पापरी परिसरात सुमारे ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे झालेल्या पडझडीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर सुरू केले आहे. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या़ आहेत़ वादळी वार्‍यास गारपिटीने घातलेल्या हैदोसात खंडाळी, पापरी परिसरातील सुमारे २०० घरांवरील पत्रे उडून गेले तर केळीच्या बागांसह वीज वितरण कंपनीचे ५०० पोल निकामी झाले. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वीज कंपनीचे २५ ते ३० कर्मचारी विद्युत खांब दुरुस्त करण्याचे काम करीत असून, खांब कमी पडत असल्याने कामात व्यत्यय येत आहे. मोहोळ तालुक्याला यावर्षी निसर्गाने दगा देत फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत सुमारे ४५ कोटींचे नुकसान झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना महसूल व कृषी विभागाने रात्रीचा दिवस करीत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून सुमारे ३० कोटी रुपयांचे वाटप केले. उर्वरित अनुदानापैकी १७ कोटी पुन्हा आले असून, त्याचेही वाटप चालू असताना २७ मे रोजी खंडाळी-पापरी या दोन गावांसह अन्य गावात जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीने कहर केला. एक तासाच्या या गारपिटीने खंंडाळी व पापरी परिसरातील सुमारे २०० घरांवरील पत्रे उडाले तर केळीच्या बागा, शेवग्याची शेती उद्ध्वस्त झाली. राजेंद्र जगन्नाथ मुळे यांची चार एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली तर रोशन नारायण जगताप (वय ८०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड पडल्याने तिच्या पायाला जखम झाली. महेश जनार्दन मुळे यांची साडेचार एकराची केळीची बाग गारांचा मार्‍यामुळे जमीनदोस्त झाली.

-----------------

वीज वितरणचे मोठे नुकसान

खंडाळी, पापरी परिसरातील अन्य गावात झालेल्या वादळी वार्‍यात वीज वितरण कंपनीचे सुमारे ५०० खांब निकामी झाले. त्यामध्ये १६८ खांब मोडले तर १०६ खांब वाकले आहेत. १७८ खांबांवरील तारा तुटल्या आहेत. यामुळे तीन हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. २५ ते ३० कर्मचार्‍यांच्या मदतीने पोल उभे करण्याचे काम सुरू आहे. नवीन खांब कमी पडत असल्याने कामात व्यत्यय येत आहे. नवीन खांब उपलब्ध झाले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागेल, असे वीज वितरण विभागाचे सहा़ अभियंता संजय शिंदे यांनी सांगितले.