शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

'आपला माणूस' या प्रतिमेने भालकेंना तारले

By admin | Published: October 22, 2014 2:45 PM

पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्‍यांदा विजयापर्यंत घेऊन गेली.

मल्लिकार्जुन देशमुखे ■ मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय, सामाजिक घडामोडींविषयी असलेली प्रचंड सतर्कता, जनसंवाद, ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्‍यांदा विजयापर्यंत घेऊन गेली. मोदी लाट व महायुतीचा प्रभाव निकामी ठरत भालकेंचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला.
अत्यंत मुरब्बी राजकारणी असलेले आ. भालके यांनी ३५ गावांचा पाणीप्रश्न या निवडणुकीत त्रासदायक ठरू नये, यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून वेळीच डाव साधला. या पाणी प्रश्नाबरोबर मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षातील नेते, मंत्री यांच्याकडे पाठपुरावा कायम ठेवला. त्याच गावातील नागरिकांच्या मतांनी भालकेंना निर्णायक आघाडी मिळवून दिली.
आ. भालकेंविरुद्ध टक्कर देत त्यांच्यावर मात करण्यासाठी किंवा कामाची पद्धतही गेल्या पाच वर्षांत विरोधक उभे करू शकले नाहीत. प्रशांत परिचारक हे शहराबरोबर ग्रामीण भागातही आ. भालकेंच्या विरोधात प्रभावी गट उभे करू न शकल्याने भालकेंसाठी ही जमेची बाजू ठरली. कमी वेळेत प्रभावी यंत्रणा उभारून शिवसेनेचे समाधान आवताडे यांनी आ. भालके व परिचारक यांना घाम फोडला. पहिल्याच प्रयत्नात ४१ हजार मते मिळवून त्यांनी मंगळवेढा तालुक्यात आपली शक्ती दाखवून दिली.
मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांबरोबर मरवडे, लक्ष्मीदहिवडी, ब्रह्मपुरी गण व भोसे गटातील मतदारांनी चांगली साथ दिल्याने विजयाचा पैलतीर गाठता आला. आ. भालकेंविरोधात प्रचार करताना मतदारांच्या हृदयाचा ठाव घेणारे प्रभावी मुद्देच न आढळल्याने मतदार धोका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे आढळून आले.
------------
मागील २५ वर्षांत मंगळवेढा तालुक्याचा विकास खुंटला होता. दुष्काळी तालुका अशी ओळख असून, शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठीच प्रयत्न करावे लागतील. - भारत भालके, आमदार 
--------------
डिपॉझिट जप्त
 ■ राज्यात सत्ताधारी असणार्‍या राष्ट्रवादी पक्षाचा मंगळवेढा बालेकिल्ला असताना या पक्षाचे उमेदवार चंद्रकांत बागल यांना डिपॉझिट जप्तीची नामुष्की आली. गादेगाव येथील त्यांच्या घरातसुध्दा सी.पी. बागल यांना तिसर्‍या क्रमांकावर मतदारांनी फेकले आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.