शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोळा महिन्यांत बदलले पाच मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST

अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभरात राज्यासह देशविदेशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यासाठी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य ...

अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभरात राज्यासह देशविदेशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यासाठी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य याची व्यवस्था बरोबरच वेळच्या वेळी विकास कामे होणे आवश्यक असते. यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे गरजेचे आहे. तेच या ठिकाणी होताना दिसत नाही. परिणामी विकास कामे खोळंबली आहेत. शहराच्या विकासाबाबत कठोर भूमिका घेणारे डॉ. प्रदीप ठेंगल हे मुख्याधिकारी म्हणून लाभले. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज होते. अखेर एका वर्षातच त्यांची शासनाने बदली केली. त्यानंतर दुसरे मुख्याधिकारी म्हणून आशा राऊत रुजू झाझ्या. चांगले काम करत असताना अचानकपणे बदली झाली. त्यांना ही एक वर्षाचा कालावधी मिळाला. कोरोना संसर्गाच्या काळा तिसरे मुख्याधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय राऊत यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. त्यांना केवळ एका महिन्याचा कालावधी मिळाला. चौथे मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. एक महिन्याच्या कालावधीत बाहेर कुठे नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले कधीच दिसले नाही. त्यानंतर मंत्रालयातून गणेश शिंदे यांची बदली अक्कलकोट येथे झाली. त्यांच्या मनासारखे ठिकाण मिळाले नसल्याने ते रुजूच झाले नाही. सचिवांचा मान न राखल्याने चिडून त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली.. त्यामुळे अखेर रुजू झाले. केवळ दोन महिन्याचा कालावधी पूर्ण न करताच बदली करून घेतले. एकंदरीत मागील सोळा महिन्यात तब्बल पाच मुख्याधिकारी बदलण्यात आले आहे.

रखडलेली विकासकामे

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सध्या तीन कोटी रुपये शिल्लक न. प. च्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी विकासकामे करावे लागते. यात्रा अनुदान निधीतून देवळाच्या परिसरातून विकासकामे करणे, यासाठी १ कोटी ३० लाख निधी शिल्लक, उद्याने सुधारण्यासाठी दीड कोटी निधी शिल्लक आहे. अक्कलकोट ते शिवपुरी रस्त्यासाठी ८ कोटी,५० लाख रुपये निधी पडून आहे. स्वच्छ भारत अभियानमधून दीड कोटी रुपये निधी शिल्लक, शहरात विविध ठिकाणी मुतारी, सुलभ शौचालय बांधणे कामी दोन कोटी रुपये निधी शिल्लक आहे. असे १८ कोटींचा निधी शिल्लक अहेत,

नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले नाही. यामुळे विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देणे, कार्यालयीन कामकाज सुरळीत चालणे, पंतप्रधान आवास , रमाई घरकुल योजनेचे बिले काढणे, नवनवीन प्रस्थाव पाठविणे, निविदा काढणे, नागरी समस्या सोडविणे, शहर स्वच्छता, प्रलंबित कामे मार्गी लावणे, अशा एक ना अनेक कामाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत.

कोट :

तीर्थक्षेत्र अक्कलकोटला कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे आवश्यक असते. मागील दहा महिने कोरोना व्हायरस, आचार संहिता, मुख्याधिकारी नसणे आशातच गेले. यामुळे विविध विकासकामांना खीळ बसत आहे. सध्या मुख्याधिकारी नसल्याने मुंबई येथे जाऊन संबंधित मंत्री महोदय यांना भेटून विनंतीपत्र देऊन आलेले आहे. लवकरच नवीन अधिकारी मिळतील अशी आशा आहे.

शोभा खेडगी, नगराध्यक्ष, नगरपालिका, अक्कलकोट