शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

वाळू अन् पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यातील बांधकामे रखडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 2:00 PM

माळशिरस : वीट, वाळू, पाणी , सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. ...

ठळक मुद्देबांधकाम साहित्याचे दर वाढले : मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा झाले कठीणदुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले

माळशिरस : वीट, वाळू, पाणी, सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. या व्यवसायात मोठी उलाढाल होत असते़ हजारो मजुरांची रोजीरोटी यावर अवलंबून आहे, मात्र सध्या वाळू आणि पाण्याअभावी बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ इतकेच नाही तर दुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले आहेत़ त्यामुळे मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास, रमाई आवास, इंदिरा आवास घरकूल योजनांमधील बांधकामे वेळेत पूर्ण करून घेणे अधिकाºयांना बंधनकारक असते़ प्रत्येक वर्षाचे ठराविक उद्दिष्ट असते़ परंतु यंदा या सर्व योजनांमधील बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाळूची टंचाई आणि दुष्काळामुळे पाण्याचा अभाव होय़ तसेच सिमेंट व स्टीलचे दर वाढलेले दिसून येत आहेत़ त्यामुळे या सर्व गोष्टींचा व्यवसायावर ही परिणाम झाल्याचे दिसून येते़ अनेक बांधकामे अर्धवट स्थितीत आहेत तर अनेक कामांना मुहूर्त रखडलेला आहे. वाळूऐवजी (क्रश सॅन्ड) लहान खडी वापरली जात असली तरी हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे.या सर्व गोष्टीमुळे या बांधकामावर काम करणाºया मजुरांचे हाल होताना दिसतात़ कारण त्यांचा संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊ लागले आहे.

बांधकामाचा वेग मंदावला- तालुक्यात प्रतिवर्षी ५०० ते ५५० बांधकामे पक्की आरसीसी होतात तर साध्या पद्धतीची १५०० ते १६०० घरे तयार होतात़ पक्क्या बांधकामाला प्रती घराला ३ ते ४ लाख तर लहान घरांना ४० ते ५० हजार रुपये मजुरी खर्च येतो़ सध्या वाळू उपलब्ध नसल्याने क्रश कडी, वाळू ४ ते ५ हजार रुपये ब्रासप्रमाणे खरेदी करावी लागते़ सिमेंट व स्टीलमध्ये १५ टक्के वाढ झालेली आहे़ मजुरी व वीट यांचे दर मात्र स्थिर आहेत़ याशिवाय उन्हाची तीव्रता वाढल्याने बांधकामासाठी लागणारे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही़ अशा वेगवेगळ्या कारणाने सध्या बांधकाम व्यवसायाचा वेग मंदावल्याचे दिसून येते, असे काही ठेकेदार व मजुरांनी सांगितले़

उसाची बिले मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील काही बांधकामांना सुरुवात झाली होती, मात्र वाळूचा तुटवडा व इतर साहित्यांचे वाढलेले दर आणि मुख्यत्वे उपलब्ध नसलेले पाणी यामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत रखडलेली आहेत़ त्यामुळे या व्यवसायाशी निगडित असणाºया अनेक घटकांवर परिणाम होत आहे़- रमेश तरंगे,आर्किटेक्चर, तरंगफळ

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणी