शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यातील ६६६ पूरग्रस्त शेतकऱ्यांना ४ कोटी ५३ लाख कर्जमाफी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST

मोडनिंब : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे भीमा नदीला पूर आला. या पूरस्थितीत शेती ...

मोडनिंब : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे भीमा नदीला पूर आला. या पूरस्थितीत शेती पिकांचे नुकसान झाले. नुकसानीसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. माढा तालुक्यातील ६६६ शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. ४ कोटी ५३ लाख कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

मागील वर्षी जुलै व ऑगस्टमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ४३ गावांना या पुराचा फटका बसला होता. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आ. बबनराव शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. बाधित शेतकऱ्यांना आघाडी सरकारने संबंधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी योजना जाहीर केली होती. येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

माढा तालुक्यातील १२ गावातील १८२ पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटी १६ लाख २० हजार ४३ रुपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. त्यामध्ये बेंबळे, मिटकलवाडी, रुई, आलेगाव (बु), रांझणी, वडोली, चांदज, आलेगाव (खु), टाकळी (टें), माळेगाव, शेवरे, गारअकोले तसेच पंढरपूर तालुक्यातील २२ गावातील ३०६ पूरग्रस्त शेतकऱ्यांना २ कोटी १६ लाख २४ हजार ७१४ इतकी कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये अजनसोंड, देगाव, शेगावदुमाला, सुस्ते, सांगवी, खेडभोसे, भोसे (तरटगाव), पेहे, उंबरे (पागे), करोळे, कान्हापुरी, पिराची कुरोली, वाडीकुरोली, चिंचोली (भो), गुरसाळे, भटुंबरे, बादलकोट, ईश्वरवठार, व्होळे, नांदोरे, देवडे, पट.कुरोली व माळशिरस तालुक्यातील ९ गावातील १७८ पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटी २० लाख ७९ हजार इतकी कर्जमाफी मिळाली असून त्यामध्ये लवंग, वाघोली, मिरे, नेवरे, उंबरे (वे), महाळुंग, जांभूड, वाफेगाव, खळवे या गावांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.

----

फेब्रुवारी, २०२० मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करून मदत देण्याची मागणी शासनाकडे केलेली होती. बाधित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. माढा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी १५ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

आ. बबनदादा शिंदे