शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते तुडवताना मानवताच जपली

By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST

भाऊ जोशी : वाटेवर काटे आले असतील; पण सेवाधर्म सोडू नका, सेवेतून मिळणारी अनुभूती परमेश्वरापर्यंत पोहोचवेल --संवाद

उरलो उपकारापुरता...
कोकणात पन्नास वर्षांपूर्वी रूग्णसेवा देणे हे आव्हान होते. रस्ते नव्हते, दळणवळणाची साधने नव्हती. संपर्क होत नव्हता. अशावेळी माणसामाणसांमधील नाते विश्वासाने जपले. नि:स्वार्थी भावनेने काम करणारी मंडळी, त्यात तरूण शिकलेला आला की, त्यातून अपेक्षा वाढायच्या. अशिक्षित समाजाला रोग आणि निदान सांगणे व सांगितले तर त्यातून त्याच्या संतापाला क्रोधाला सामोरे जाणे हे दिव्यच. हे दिव्य आम्ही पार पाडले. आजच्या पिढीला अभ्यासासाठी क्षेत्र विस्तारली असली तरी त्यांच्यामध्ये क्षमता सिध्द करायला भरपूर वाव आहे. स्पर्धा असली तरी प्रामाणिकपणे काम करून अप्रामाणिक गोष्टी न करण्यावर भर दिला तर त्यातून सत्याचा विचार निर्माण होईल व प्रत्येकाला अभिप्रेत असलेले मनस्वी समाधान मिळेल. आजच्या तरूणांनी हे करावे व सेवाधर्म जागवावा, असे विचार धन्वंतरी डॉ. भाऊ जोशी यांनी मांडले आहेत.

जिल्ह्यात जिथे एस. टी. नव्हती, जगण्यासाठी जिथे लोकांना केवळ दारिद्र्याशीच संघर्ष करावा लागत होता, पै-पैशांसाठी काबाडकष्ट करावे लागत होते आणि दूर... कोसो दूर... चालूनही एखादा आजार झाल्यास उपचार घेता येत नव्हते, अशावेळी माणसांच्या भेदक नजरा, राग, कुपोषण, मोठे कुटुंब व उदरनिर्वाह कसा चालवायचा, या आव्हानात्मक परिस्थितीत एखादा डॉक्टर वाटा तुडवत रूग्णापर्यंत पोहोचला, तर तो देवदूतच ठरायचा. त्यावेळचे हे प्रेम मी आज विसरू शकत नाही. त्यावेळची निष्ठा, माध्यमे आणि दळणवळणाची साधने गावापर्यंत पोहोचलेली नसताना करायला मिळालेली रूग्णांची सेवा हाच माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. आज पाय थकले असले तरीही त्या व्यक्तिरेखा जगायला कसे सामर्थ्य देतात, याची अनुभूती देतात.
आडिवरे (ता. राजापूर) येथील डॉ. भालचंद्र तथा भाऊ जोशी हे गरिबांचे डॉक्टर म्हणून गेली पन्नास वर्षे या जिल्ह्यात प्रसिध्द आहेत. या जिल्ह्याला भौगोलिक संकटांनी त्यावेळी घेरलेले होते. रस्ते, पाणी, एस. टी., शाळा, आरोग्यविषयक सुविधांची वानवा. अशा काळात भाऊंनी गावात प्रवेश केला आणि गावातील धन्वंतरी म्हणून त्यांना लौकीक मिळाला. साहित्यिक, विनोदी वक्ते, शिक्षण, सहकार, सभा संमेलने, परिषद, नट, रंगभूमी, सरकारचा उच्चपदस्थ अधिकारी, गावात पश्चिम महाराष्ट्रातून नव्याने आलेले शिक्षक दाम्पत्य, समाज बांधव, शाळा तपासणीसाठी गावात येणारे अधिकारी यांची भाऊंशी मैफल जमायची. मूळ पेशा वैद्यकीचा असला तरीही कुटुंबातल्या प्रत्येक समारंभात भाऊंचा वाटा हा महत्त्वाचा. तो त्यांनी चालविला. आज त्यांनी पेशातून निवृत्ती घेतली नसली आणि वयाने थकले असले तरी त्यांचा उत्साहाचा स्रोत कमी झालेला नाही. आज अनेक संस्थांच्या उभारणीत काम करताना त्यांनी नव्या पिढीला संदेश दिलाय तो जगायला शिकविणारा आणि नव्याना प्रेरणा देणारा ठरलाय.
आज आमच्यापेक्षा हुशार आहेत. त्यावेळीही होते. मात्र, आम्ही तडजोड केली नाही, गुणवत्ता सिध्द करताना गरज पडेल तेथे पोहोचलो आणि रूग्णांच्या आयुष्यात प्रकाशवाटा दाखविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न करताना पेशाशी बेईमानी, गरिबांना कष्टातून उभी केलेली मनाची श्रीमंती जोपासायला विसरलो नाही, विद्यार्थ्यांना, अडचणीत सापडलेल्यांना औषधांसाठी पैसा महत्त्वाचा मानला नाही, उपचार करून त्याला समाधान मिळेल असेच प्रयत्न करीत राहिलो.
भाऊंच्या जीवनशैलीत त्यांनी आयुष्यभर चिंतन, मनन, वाचन, कविता, लेख, कादंबरी, नाटक, विनोद यांची साथ केली. पु. ल देशपांडे, चिं. वि. जोशी, राम गणेश गडकरी यांच्या वाङयाचा ते रसिकतेने आनंद घेतात. आज त्यांचा सहभाग, नेतृत्व असलेल्या अनेक संस्था या भागात आहेत. त्यांनी प्रत्येक संस्थेत काम करताना संस्था, कार्यक्षेत्र मोठे केले. मात्र, त्यांनी सर्वांना बरोबर घेताना प्रत्येकाला सांगितले जीवनात जे क्षेत्र स्वीकाराल, त्याला प्रामाणिकपणे न्याय द्या.
- धनंजय काळे