शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन होणार तरी केव्हा?, कुटुंबावर उपासमारीची वेळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 13, 2022 19:00 IST

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही ठिकाणचे शिक्षकांच्या रजा कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घड्याळी तासिका शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतात. परंतु या शिक्षकांचे मानधन मागील अनेक महिन्यांपासून रखडले असल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मानधन तातडीने देण्याची मागणी या शिक्षकांमधून होत आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी  शिक्षकांमधून होत आहे.माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा नेहमीचाच विषय राहिला आहे. गेली काही वर्षे भरती प्रक्रिया बंद आहे. शिक्षकांच्या भरतीची मागणी सातत्याने होत असताना शिक्षक भरती होताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कायमस्वरूपी प्रश्नावर घड्याळी तासिका शिक्षकांचा तात्पुरता उपाय शासन, प्रशासनाकडून केला जात आहे. परिणामी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर अनेक शिक्षक ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत.शिक्षणमंत्री येथे लक्ष देतील काय?राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांच्या या गंभीर विषयात लक्ष घालून घड्याळी तासिकांवर काम करणार्या शिक्षकांना न्याय मिळवून देणे आवश्यक बनले आहे.प्रशासनातील काही चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे उच्चशिक्षित युवक, युवती जे समाज घडविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्या श्रमाचे मोलदेखील वेळेत मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

वेळेते मानधनाची शासनाची जबाबदारीतासिकांवर शिकविणारे शिक्षक उच्च शैक्षणिक पात्रताधारक आहेत. परंतु नोकरी मिळत नसल्याने अल्प मानधनात शाळेत शिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांना वेळेत मानधन देण्याची जबाबदारी शासनाची आहे.

प्रतितास १०० रूपये कराघड्याळी शिक्षकांना हायस्कूलकरीता ७२ रूपये तास मानधन दिले जाते. माध्यमिककरीता ५४ रूपये प्रतितास दिले जातात. महागाईचा विचार करता १०० रूपये प्रतितास मानधनात वाढ होण्याची आवश्यकता आहे. तशी वाढ व्हावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.शिक्षकांनी उपाशीपोटी शिकवावे कसे ?चार ते सहा महिन्यांपासून शिक्षकांना मानधन देण्यात आलेले नाही. घड्याळी तासिका शिक्षकांना शासनाकडून प्राप्त निधीतून शासनाकडून मानधन दिले जाते. त्यामुळे पाच ते सहा महिने या शिक्षकांनी उपाशीपोटी शिकवावे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा ? असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाले आहेत.अंत पाहू नकावेळेत मानधन मिळत नसल्याने प्रतीक्षा संपता संपेना, अशी अवस्था या शिक्षकांची आहे. प्रशासनाने आमच्या संयमाचा अंत पाहून नये, रखडलेले मानधन तातडीने द्यावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.मालवण येथील भंडारी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणतात....या राज्याच्या शिक्षण खात्यात, त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड गोंधळ आहे. भंडारी हायस्कूल इथे तासिका तत्वावर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या या गुरुजनांना आज ६-७ वर्षे झाली तरी अद्याप पगार नाही. त्यासाठी अनेकदा प्रस्ताव दिला आणि  वारंवार पत्रव्यवहार केला तरीही यांचे  मंजुरीचे  पेपर पुढे सरकत नाहीत आणि यांना जाब विचारणारे कोणी नाही. एका बाजूला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे संबंधित कर्मचारी मात्र भरमसाट वेतन घेत आहेत. यात न्याय मिळावा आणि याना लवकर त्यांचे पैसे त्यांना मिळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक