शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:22 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात झालेली नव्हती.

ठळक मुद्दे कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डेनद्या, नाले पुन्हा एकदा तुडुंब : महामार्गावर खड्डेच खड्डे

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात  झालेली नव्हती.कणकवली तालुक्यात मागील दोन-चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांची पुन्हा पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी पाऊस काहीसा उशिराने पडायला सुरुवात झाली होती. मात्र, गतवर्षीप्रमाणेच तालुक्यात पावसाने आतापर्यंत सरासरी गाठली आहे. या सातत्यपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.गेला आठवडाभर जोरदार पडणाºया पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांवर चिखलाचे पाणी उडत आहे.रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रांताधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

त्यामुळे या रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहन चालकांनाही वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पाऊस थांबल्यावर येथील पाणी ओसरले. अशीच स्थिती शहरातील काही ठिकाणच्या रस्त्यांवर दिसून येत होती.वाहनचालकांना करावी लागतेय कसरतमुंबई-गोवा महामार्गावर दोन आठवड्यांपूर्वी नव्याने पावसाळी डांबरीकरण करून महामार्ग तयार केला होता. ज्याठिकाणी खड्डे पडले होते त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात महामार्गाच्या ठेकेदाराने खड्डे बुजविले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर पुन्हा महामार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना या मार्गावर मोठी कसरत करावी लागत आहे. गेले दोन दिवस पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्डे मोठे होत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग