शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतनच्या प्रेमात

By admin | Updated: October 23, 2014 22:54 IST

विधानसभा निवडणूक : अपयशानंतर आता आत्मपरीक्षण

रत्नागिरी : जिल्ह्यात आलेल्या अपयशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा चिंतनच्या प्रेमात पडणार आहेत. या दोन्ही पक्षांनी चिंतन करण्यासाठी चिपळूणची निवड केली आहे. चिपळूण शहर राष्ट्रवादी आणि चिपळूण, संगमेश्वर तसेच गुहागरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.निवडणुकीत अपयश आल्यानंतर चिंतन करण्याची परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी याही निवडणुकीत जपणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाली. त्यामुळे कार्यकर्ते खजील झाले आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या चार उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. राष्ट्रीय पक्षावर आलेली ही कठीण वेळ कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता आपापल्या परीने चिंतन करण्याचा निर्णय घेतला.काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अशोक जाधव यांनी गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची ३१ आॅक्टोबर रोजी चिपळुणात चिंतन बैठक होणार असल्याचे म्हटले आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष सुरेश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे. जनतेने दिलेला कौल आपणाला मान्य आहे. मात्र, आजही कोकणातील प्रमुख पक्षात काँग्रेसची गणना होते. आघाडीत झालेली फाटाफूट यावेळी पक्षासाठी हानिकारक ठरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी ही चिंतन बैठक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.जिल्ह्यात राष्ट्रवादीने दोन जागा मिळवल्या असल्या तरी चिपळुणातील महत्त्वाची जागा खात्री असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ अंतर्गत मतभेदामुळे गमावली आहे.चिपळूण शहरासाठी अपेक्षित यश न आल्याने व मतदारसंघातील अन्य भागातही कमी पडल्याने राष्ट्रवादीला चिपळुणात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दिवाळीनंतर राष्ट्रवादीत चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पराभवाची कारणमिमांसा व भविष्यात घ्यावी लागणारी दक्षता याची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)खचणार नाही... लढणार!गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चिपळूण शहरात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अपयश आले. याबाबत दिवाळीनंतर होणाऱ्या चिंतन बैठकीत आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत.- श्रीकृष्ण खेडेकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादीजिल्ह्यात काँग्रेसचा झालेला पराभव आम्ही मान्य केला आहे. मात्र, काँग्रेस पक्ष हा कोकणातील प्रमुख पक्षांपैकी एक आहे. त्यामुळे आम्ही खचून जाणार नाही. फक्त सततच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी चिपळुणात चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे.- अशोक जाधव, काँग्रेस